शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

भाजपचे पुढचे टार्गेट मुंबई, कोकण अन् शिवसेना! राणे, पाटील यांच्या समावेशाने शिवसेनेला शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:36 IST

राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात.

यदू जोशी -मुंबई: नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन मुंबईकोकणावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याची पुढील काळात रणनीती दिसते.

राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेचा विरोध असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशात आणि नंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्यात विलंब झाला, असे म्हटले गेले होते. राणे यांच्या रूपाने प्रखर शिवसेना विरोधकास संधी दिल्याने यापुढील काळात दोन पक्षांमधील संबंध अधिक ताणले जातील, असे दिसते. हे दोन पक्ष पुन्हा एकदा जवळ येणार असल्याचे म्हटले जात होते; पण मंगळवारी संपलेले विधिमंडळ अधिवेशन आणि बुधवारी राणेंचा मंत्रिमंडळात झालेला समावेश पाहता दोन्ही पक्षांमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरातील महापालिकांच्या निवडणुका यावर्षी आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत आहेत. मुंबई, कोकणात राणे तर ठाणे, भिवंडी, पालघरच्या पट्ट्यात कपिल पाटील यांच्या प्रभावाचा वापर शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी करवून घेण्याची भाजपची रणनीती दिसते. मुंबई व परिसरात मोठी संख्या असलेल्या आगरी समाजाच्या व्होटबँकेवर भाजपने लक्ष केंद्रित केलेले दिसते. प्रीतम मुंडे यांना मंत्री न करता डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने वंजारी चेहरा दिला गेला; हा मुंडे परिवारासाठी धक्का मानला जातो.

प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना वगळले. हे दोघेही मूळ भाजपजन आहेत. धोत्रे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक मानले जातात. नारायण राणे, कपिल पाटील व भारती पवार हे मूळ भाजपजन नाहीत. राणे यांचा प्रवास शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राहिला, तर पाटील व पवार पूर्वी राष्ट्रवादीत होते. बाहेरून आलेल्यांना पक्षात संधी आजवर दिली गेली नव्हती. आता तो दरवाजा उघडलेला दिसतो. जावडेकर यांना वगळणे सर्वांत धक्कादायक ठरले. रावसाहेब दानवे यांनी स्वत:चे स्थान टिकवले. धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचा टक्का कमी झाला; पण महाराष्ट्राचा वाढला आधी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते. आता तीन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री असतील.

मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेले चारही चेहरे बघता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली असे दिसते. स्वत: फडणवीस यांनी ते केंद्रात जाणार नाहीत, हे आधीच स्पष्ट केले होते. मंत्रिमंडळात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात ज्या निवडक नेत्यांशी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली, त्यात फडणवीस प्रामुख्याने होते.

केंद्रीय मंत्री विभागनिहाय- पीयूष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले,कपिल पाटील (मुंबई, कोकण) - ४- नितीन गडकरी (विदर्भ) - १- डॉ. भारती पवार (उत्तर महाराष्ट्र) - १- रावसाहेब दानवे, भागवत कराड (मराठवाडा) - २

- नारायण राणे (मराठा), कपिल पाटील (आगरी), डॉ. भारती पवार (आदिवासी) आणि डॉ. भागवत कराड (वंजारी) असे सामाजिक संतुलन साधण्यात आले.- प्रकाश जावडेकर यांना वगळल्याने पश्चिम महाराष्ट्राला मोदी मंत्रिमंडळात स्थान नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात आधी महाराष्ट्राचे सहा मंत्री होते आता ही संख्या आठ झाली आहे.- डॉ. संजय धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व एकाने कमी झाले.- डॉ. भागवत कराड यांना संधी लाभल्याने आणि रावसाहेब दानवे आधीच राज्यमंत्री असल्याने  मराठवाड्याचे दोघे केंद्रात मंत्री असतील. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणेMumbaiमुंबईkonkanकोकण