शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजपचा दुरावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:23 IST

मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपसोबत दिसत नाहीत. एकूणच मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजप अंतर राखत असल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात मेगाभरती घेण्यात आली होती. शिवसेनेची मदत न घेता स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा होता. त्याला विरोधी पक्षनेत्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी साद देत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, यापैकी अनेक नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. तर निवडून आलेल्या नेत्यांपासून भाजप दुरावा ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नारायण राणे, मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु, या नेत्यांना आता निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये फारस महत्त्व मिळत नसल्याचे चित्र आहे. खुद्द विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळातच राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घाई केली होती. त्यांना प्रवेशही मिळाला. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राणे यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आपण सहकार्य करणार असून फडणवीसांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपविल्याचं त्यांनी नमूद केले होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने प्रतिक्रिया देत ते त्यांचं व्यक्तगत मत असल्याचे सांगत राणेंना दूर सारण्याचा प्रयत्न केला. 

दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपच्या पत्रकार परिषदा किंवा इतर बैठकांमध्ये फारसे दिसत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात युतीला 12-0 असा विजय मिळवून अशी वल्गना केली केली होती. मात्र आघाडीने नगरमध्ये मुसंडी मारत 9-3 असा विजय मिळवला. कदाचित त्यामुळेच विखे पाटील यांच्यापासून भाजप अंतर ठेवत आहे. याचप्रमाणे मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपसोबत दिसत नाहीत. एकूणच मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजप अंतर राखत असल्याचे दिसून येत आहे.