शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:36 IST

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बलाढ्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आपलं इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीची युती निश्चित करणाऱ्या भाजपला स्वबळावर लढून सत्ता मिळण्याचे, संकेत मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण ऑगस्ट महिना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचा सहाजिकच भाजपला फायदा होणार असून दिग्गज नेत्यांच्या इनकमिंगमुळे देखील भाजपची ताकत शिवसेनेपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे आयारामांची पहिली पसंती, भाजपलाच असल्याचे दिसून येते.

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेला ९० जागा आणि आघाडीला ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना भाजप एकत्र लढल्यास दोघांना २३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात भाजपच मोठा पक्ष ठरणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपकडून कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासंदर्भात सूचना मिळत असून त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे.

राज्यात भाजपची सत्ता येणार या विचाराने अनेक नेत्यांनी प्रवेश केला. तर शिवसेना-भाजप युती राहणार हे ठरवून काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल २० हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून १० हून अधिक नेते तयारीत आहे. तर जयदत्त क्षीरसागर आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, भाजपची वाढलेली ताकत, शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना पुनर्विचार करायला लावणारी आहे.

सध्या राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची चढाओढ लागल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आम्ही नेत्यांना पारखूनच सेनेत प्रवेश देत असून त्यांना कुठलाही शब्द देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. तसेच शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणारे नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत गेले आहे.