शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:36 IST

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बलाढ्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आपलं इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीची युती निश्चित करणाऱ्या भाजपला स्वबळावर लढून सत्ता मिळण्याचे, संकेत मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण ऑगस्ट महिना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचा सहाजिकच भाजपला फायदा होणार असून दिग्गज नेत्यांच्या इनकमिंगमुळे देखील भाजपची ताकत शिवसेनेपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे आयारामांची पहिली पसंती, भाजपलाच असल्याचे दिसून येते.

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेला ९० जागा आणि आघाडीला ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना भाजप एकत्र लढल्यास दोघांना २३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात भाजपच मोठा पक्ष ठरणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपकडून कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासंदर्भात सूचना मिळत असून त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे.

राज्यात भाजपची सत्ता येणार या विचाराने अनेक नेत्यांनी प्रवेश केला. तर शिवसेना-भाजप युती राहणार हे ठरवून काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल २० हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून १० हून अधिक नेते तयारीत आहे. तर जयदत्त क्षीरसागर आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, भाजपची वाढलेली ताकत, शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना पुनर्विचार करायला लावणारी आहे.

सध्या राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची चढाओढ लागल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आम्ही नेत्यांना पारखूनच सेनेत प्रवेश देत असून त्यांना कुठलाही शब्द देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. तसेच शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणारे नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत गेले आहे.