शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:36 IST

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बलाढ्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आपलं इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीची युती निश्चित करणाऱ्या भाजपला स्वबळावर लढून सत्ता मिळण्याचे, संकेत मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण ऑगस्ट महिना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचा सहाजिकच भाजपला फायदा होणार असून दिग्गज नेत्यांच्या इनकमिंगमुळे देखील भाजपची ताकत शिवसेनेपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे आयारामांची पहिली पसंती, भाजपलाच असल्याचे दिसून येते.

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेला ९० जागा आणि आघाडीला ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना भाजप एकत्र लढल्यास दोघांना २३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात भाजपच मोठा पक्ष ठरणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपकडून कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासंदर्भात सूचना मिळत असून त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे.

राज्यात भाजपची सत्ता येणार या विचाराने अनेक नेत्यांनी प्रवेश केला. तर शिवसेना-भाजप युती राहणार हे ठरवून काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल २० हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून १० हून अधिक नेते तयारीत आहे. तर जयदत्त क्षीरसागर आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, भाजपची वाढलेली ताकत, शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना पुनर्विचार करायला लावणारी आहे.

सध्या राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची चढाओढ लागल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आम्ही नेत्यांना पारखूनच सेनेत प्रवेश देत असून त्यांना कुठलाही शब्द देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. तसेच शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणारे नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत गेले आहे.