शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 11:23 IST

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

मुंबई – नाशिकहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या मनसे नेते अमित ठाकरेंची कार सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आली. याठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे अमित ठाकरेंना काही मिनिटे ताटकळत राहावे लागले. हा राग मनात धरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. मनसैनिकांनी केलेल्या या कृत्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा अशा शब्दात भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक मनसे कार्यकर्त्यांसह नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. स्वप्निल मोरे नावाच्या युझरने २०१४ चा संदर्भ देत सत्तेत आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू या आश्वासनाची आठवण करून दिली. तर अमोघ गायकवाड यांनी फास्टटॅगमध्ये बिघाड होता मग कार का अडवल्या जातात? टोलनाक्यावर तांत्रिक बिघाड होता. राजकीय मतभेद विसरून सामान्यांचा विचार करा. टोल चालकांची अरेरावी चालू आहे. कोणतेही नियम फॉलो केले जात नाही असं म्हटलं आहे.

तर राज फॅनक्लबने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुंडे म्हणाले होते की, टोलमुक्त महाराष्ट्र करा अशी मागणी महायुतीची आहे. जर तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र केला नाही तर आमचे सरकार आल्यास आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि टोलच्या उत्पन्नाबाबत जे प्रश्न निर्माण होतील त्याबाबत आम्ही तज्ज्ञांची समिती नेमू, टोलला नवा पर्याय शोधू पण महाराष्ट्र टोलमुक्त करू असं २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने म्हटलं होते.

त्याचसोबत आर. आर म्हात्रे या युझरने देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात महाराष्ट्रातील टोलमाफिया कुणाच्या जोरावर? असा प्रश्न केला होता. त्यावर फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि जिल्हा महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात रस्त्यांचे नाही तर खड्ड्यांचे राज्य आहे. सामान्यांचे पैसे कुठे जातात? सरकारला केवळ टोलमध्ये रस आहे. टोलचा झोल असा की ठेकेदारच गाड्यांची नोंद ठेवतो, त्याचा आराखडा घेतो, ठेकेदार टेंडर तयार करतो आणि तोच ठेकेदार टेंडर भरतो. वर्षानुवर्षे सामान्य माणूस टोल भरत असतो. हा टोलचा झोल बंद करावा लागेल असं फडणवीस म्हणाले होते. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेBJPभाजपा