शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 11:23 IST

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

मुंबई – नाशिकहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या मनसे नेते अमित ठाकरेंची कार सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आली. याठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे अमित ठाकरेंना काही मिनिटे ताटकळत राहावे लागले. हा राग मनात धरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. मनसैनिकांनी केलेल्या या कृत्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा अशा शब्दात भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक मनसे कार्यकर्त्यांसह नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. स्वप्निल मोरे नावाच्या युझरने २०१४ चा संदर्भ देत सत्तेत आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू या आश्वासनाची आठवण करून दिली. तर अमोघ गायकवाड यांनी फास्टटॅगमध्ये बिघाड होता मग कार का अडवल्या जातात? टोलनाक्यावर तांत्रिक बिघाड होता. राजकीय मतभेद विसरून सामान्यांचा विचार करा. टोल चालकांची अरेरावी चालू आहे. कोणतेही नियम फॉलो केले जात नाही असं म्हटलं आहे.

तर राज फॅनक्लबने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुंडे म्हणाले होते की, टोलमुक्त महाराष्ट्र करा अशी मागणी महायुतीची आहे. जर तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र केला नाही तर आमचे सरकार आल्यास आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि टोलच्या उत्पन्नाबाबत जे प्रश्न निर्माण होतील त्याबाबत आम्ही तज्ज्ञांची समिती नेमू, टोलला नवा पर्याय शोधू पण महाराष्ट्र टोलमुक्त करू असं २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने म्हटलं होते.

त्याचसोबत आर. आर म्हात्रे या युझरने देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात महाराष्ट्रातील टोलमाफिया कुणाच्या जोरावर? असा प्रश्न केला होता. त्यावर फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि जिल्हा महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात रस्त्यांचे नाही तर खड्ड्यांचे राज्य आहे. सामान्यांचे पैसे कुठे जातात? सरकारला केवळ टोलमध्ये रस आहे. टोलचा झोल असा की ठेकेदारच गाड्यांची नोंद ठेवतो, त्याचा आराखडा घेतो, ठेकेदार टेंडर तयार करतो आणि तोच ठेकेदार टेंडर भरतो. वर्षानुवर्षे सामान्य माणूस टोल भरत असतो. हा टोलचा झोल बंद करावा लागेल असं फडणवीस म्हणाले होते. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेBJPभाजपा