शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 11:23 IST

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

मुंबई – नाशिकहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या मनसे नेते अमित ठाकरेंची कार सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आली. याठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे अमित ठाकरेंना काही मिनिटे ताटकळत राहावे लागले. हा राग मनात धरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. मनसैनिकांनी केलेल्या या कृत्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा अशा शब्दात भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक मनसे कार्यकर्त्यांसह नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. स्वप्निल मोरे नावाच्या युझरने २०१४ चा संदर्भ देत सत्तेत आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू या आश्वासनाची आठवण करून दिली. तर अमोघ गायकवाड यांनी फास्टटॅगमध्ये बिघाड होता मग कार का अडवल्या जातात? टोलनाक्यावर तांत्रिक बिघाड होता. राजकीय मतभेद विसरून सामान्यांचा विचार करा. टोल चालकांची अरेरावी चालू आहे. कोणतेही नियम फॉलो केले जात नाही असं म्हटलं आहे.

तर राज फॅनक्लबने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुंडे म्हणाले होते की, टोलमुक्त महाराष्ट्र करा अशी मागणी महायुतीची आहे. जर तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र केला नाही तर आमचे सरकार आल्यास आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि टोलच्या उत्पन्नाबाबत जे प्रश्न निर्माण होतील त्याबाबत आम्ही तज्ज्ञांची समिती नेमू, टोलला नवा पर्याय शोधू पण महाराष्ट्र टोलमुक्त करू असं २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने म्हटलं होते.

त्याचसोबत आर. आर म्हात्रे या युझरने देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात महाराष्ट्रातील टोलमाफिया कुणाच्या जोरावर? असा प्रश्न केला होता. त्यावर फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि जिल्हा महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात रस्त्यांचे नाही तर खड्ड्यांचे राज्य आहे. सामान्यांचे पैसे कुठे जातात? सरकारला केवळ टोलमध्ये रस आहे. टोलचा झोल असा की ठेकेदारच गाड्यांची नोंद ठेवतो, त्याचा आराखडा घेतो, ठेकेदार टेंडर तयार करतो आणि तोच ठेकेदार टेंडर भरतो. वर्षानुवर्षे सामान्य माणूस टोल भरत असतो. हा टोलचा झोल बंद करावा लागेल असं फडणवीस म्हणाले होते. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेBJPभाजपा