शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मागासवर्गाच्या मतांसाठी भाजपाचा ‘भीमसंकल्प’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:43 IST

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे.

- योगेश पांडे नागपूर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वस्त्या-वस्त्यांवर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात घेणार आहे, तसेच न्यायपालिकेत आरक्षण लागू करावे, असा प्रस्तावही अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पारित करण्यात आला.मागील साडेचार वर्षांत रोहित वेमुलाचे प्रकरण, उत्तर प्रदेशसह विविध राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांवर झालेले हल्ले, तसेच आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अनुचित वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले.केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी असल्याची टीका झाली. याचा फटका भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुकीत बसला. म्हणूनच भाजपाशासित प्रदेशात अनुसूचित जातींच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.एकीकडे आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देत सवर्णांना खूश केल्यानंतर आता अनुसूचित जाती-जमातींच्या ‘व्होटबँक’वर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच नागपुरात अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी आदी उपस्थित होते.२० ते ३० जानेवारी या कालावधीत देशभरात भाजपाच्या अनुसूचित जातीच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणींच्या बैठका घेण्यात येणार आहेत. यात पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यात येईल. त्यानंतर १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत मंडळ स्तरावर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होईल. १२ फेब्रुवारीपासून ते २ मार्चपर्यंत व्यापक जनसंपर्क मोहीम चालविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. भाजपाने सौभाग्य योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज दिली. उज्ज्वला योजनेद्वारे गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जातींमधील लोकांना झाला. २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती-मुख्यमंत्रीमुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपाच्या विजय संकल्पसभेत केला. आपल्या बापाचे स्मारक उभे केले, पण संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही, शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.>मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा !पुणे-आता मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्याचा कार्यक्रम भाजपाने आखला आहे. ‘हमारा घर भाजपा का घर’ हा पक्षाचा मुख्य अजेंडा असून, जे मतदार भाजपाला मतदान करणार आहेत, ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून पाठिंबा देतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :BJPभाजपा