शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

भाजपच्या 'बाय' अन् शिवसेनेच्या ऐनवेळच्या 'हाय'मुळं धीरज देशमुखांना बळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:08 PM

मतदारसंघातील पंचायत समितीत देखील प्रतिनिधीत्व नसलेल्या शिवसेनेला हा मतदारसंघ देण्यात आला. शिवसेनेने देखील मतदार संघातील ताकतीनुसार मुंबईत वास्तव्य असलेल्या सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊन धीरज देशमुख यांना मोडके तोडके आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - लातूर जिल्ह्यातील आघाडीची स्थिती काहीशी मजबूत दिसत आहे. माजीमुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन मुलं यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अभिनेता रितेश देशमुख दोघांच्या प्रचारासाठी लातुरात तळ ठोकून आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात तरी प्रचारामध्ये काँग्रेस पुढे दिसत आहे. त्यातच धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून ऐनवेळी भाजपकडून मिळालेला बाय आणि शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पार्सल उमेदवारामुळे निवडणूक काही प्रमाणात सुकर झाल्याची चर्चा मतदार संघात आहे.

लातूर जिल्हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु, विलासराव देशमुख यांच्या पश्चात लातूर काँग्रेसला काही प्रमाणात उतरती कळा लागली. लोकसभेपाठोपाठ काही विधानसभा मतदार संघ, महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीत भाजपने काँग्रेसला सलग धक्के दिले. मात्र अमित देशमुख यांनी आपला मतदारसंघ सुरक्षीत ठेवला.

आता लातूर शहरमधून अमित आणि ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वास्तविक पाहता, रेणापूर मतदारसंघ म्हणजेच आताचा लातूर ग्रामीण. याच मतदार संघातून गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपच जाळ विनलं होतं. त्यामुळे भाजपसाठी येथे आधीच पायाभरणी झाली होती. त्यानुसार रमेश कराड यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र भाजपकडे हा मतदारसंघ जाणार नाही, यासाठी वरच्या पातळीवर सुत्रे फिरल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघातून धीरज यांना अप्रत्यक्षरित्या भाजपकडून बाय मिळाला का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

दुसरीकडे मतदारसंघातील पंचायत समितीत देखील प्रतिनिधीत्व नसलेल्या शिवसेनेला हा मतदारसंघ देण्यात आला. शिवसेनेने देखील मतदार संघातील ताकतीनुसार मुंबईत वास्तव्य असलेल्या सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊन धीरज देशमुख यांना मोडके तोडके आव्हान देण्याचा प्रयत्न केला. एकूणच या सर्व घडामोडीमुळे धीरज यांना भाजपचा बाय तर शिवसेनेचा ऐनवेळी आलेला हाय, अशी ही लढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.