शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

"सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 16:06 IST

BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance : आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

इंडिया आघाडीत संयोजक कोण? हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने अखेर समन्वय समितीने त्यावर तोडगा काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीची रणनीती १४ जणांची समिती ठरवणार आहे. या समितीत  काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे. 

आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "बेरोजगार घराणेशाही वाचवण्यासाठी तयार झाली घमंडीया आघाडी" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज..." म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. 

इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण अखेर लांबणीवर पडले. आघाडीत नवीन पक्ष आल्याने त्यांचेही या लोगोवर एकमत होणे आवश्यक असल्याने अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. एक-दोन दिवसात लोगोचे अनावरण दिल्लीत होईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत. हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल.  

घमेंडिया कोण हे देश बघतोय -  शरद पवारइंडिया आघाडीचा उल्लेख भाजपाचे नेते ‘घमेंडिया आघाडी’ असा करतात. मात्र, आम्ही केवळ एकत्र येण्याची चर्चा केली तरी त्यावर भाजपाचे नेते टीका करतात. आम्ही भेटलो तर त्यावरही टीका करतात. यावरून असे दिसते की, १० वर्ष देशाची सत्ता भोगूनही हे जमिनीवर नाहीत. यावरून घमेंडिया कोण आहे हे दिसते. आमच्यावर कितीही टीका केली तरी आता आम्ही थांबणार नाही. 

आम्ही विरोधक नाही, तर देशप्रेमी - उद्धव ठाकरे परिवारवाद म्हणून आमच्यावर टीका केली जाते. पाटण्याच्या बैठकीत मी सांगितले होते की, भारत माझा परिवार आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही विरोधक नाही तर देशप्रेमी आहोत. देशाला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. मुंबईतील बैठकीत इंडियाची ताकद वाढली. दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत आहे. त्यामुळे एनडीएच्या मनात भीती वाढली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPoliticsराजकारण