शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

महाराष्ट्रातच नाही तर भारतातही एकट्याने लढू : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 21:42 IST

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले विचार मांडले. आगामी काळात भाजपच्या संघटनावाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. अशावेळी आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर असे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र ''महाविकास आघाडी आता सर्वदूर एकत्र येऊन लढणार हे आम्ही गृहीत धरले आहे. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात भाजपला एकट्याला लढावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे.  त्याची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत' असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे.  त्यांची

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले विचार मांडले. आगामी काळात भाजपच्या संघटनावाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

  •  सलग दुसऱ्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आहे, त्याविषयी पहिली प्रतिक्रिया काय आहे ?

जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप मानला जातो. अशा पक्षाचा एकदा प्रदेशाध्यक्ष व्हायला मिळालं याचा आनंद होताच आता ती जबाबदारी पुन्हा मिळाल्याचा अभिमान आहे. या पुढील काळात कार्यकर्त्यांचे सत्ताधरी पक्षाचे कार्यकर्ते ते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अशी मानसिकता करण्यात खूप मेहनत घ्यावी लागेल. आमचा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम नक्की करू. 

 

  • भाजपमध्येही एकनाथ खडसेंसारखे नेते अजूनही नाराज असल्याचे बोलले जाते, त्यासाठी काही विशेष परिश्रम घेणार का ?

 प्रत्येक कुटुंबात थोडीफार नाराजी असतेच. मात्र ती नाराजी संपवली जाते आणि लोक आयुष्यभर त्यात राहतात. हे तर आमचं विचारांचं कुटुंब आहे. त्यामुळे ही नाराजी त्या-त्यावेळी संपवली जाते, गेली आहे. यापुढेही असा कोणता पक्ष निर्माण झाला तर सोडवण्यास आम्ही  समर्थ आहोत.

  • महाविकास आघाडीचे सरकार घेत असलेल्या निर्णयांकडे कसे बघता ? 

 सरकारच्या चांगल्या निर्णयाचं स्वागत आहे. डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, मराठीची सक्ती राष्ट्रगीत सक्ती, शिवभोजन थाळी अशा निर्णयांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी कर्जमाफी फसवी दिली आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही. अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची कर्जमाफी केलेली नाही. त्यांनी सध्या दिलेली करमाफी ही आधीच्या सरकारने दिलेली आहे. 

  • तुम्हाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते, त्याचा काही त्रास होतो का ?

 आम्ही समाधानी आहोत. दिवसभराच्या कामाच्या आढाव्यानंतर काही चूक झाली असे वाटत नसेल तर अशा 'ट्रोलिंग-बिलिंग'ला मला काही अर्थ वाटत नाही.काही बाबतीत अतिरेक होतो आहे. खुर्ची तुटण्यासारखी क्षुल्लक गोष्ट ट्रोल होणे पटण्यासारखे नाही. 

  • पालकमंत्री म्हणून अजित पवार पुण्याच्या प्रश्नांसंदर्भांत करत असलेल्या कामावर समाधानी आहात का  ?

 मी देखील पुण्याचा पालकमंत्री होतो. अजित पवार आढावा घेतात याचा आनंद आहेत. पण ते घेत असलेला आढावा हा आम्ही घेतलेल्या निर्णयांचा घेत आहेत. आम्हीच आणलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा, मेट्रो, रिंगरोड अशाच योजनांना ते गती देत आहेत. 

  • तुमचं फेरनिवडणूक होतील हे वक्तव्य गाजले होते, त्यावर अजूनही ठाम आहात का ?

सरकारमध्ये अंतर्गत विरोध वाढतो आहे. उदा. नितीन राऊत म्हणतात वीज मोफत तर दुसरीकडे अजित पवार पैसे कुठून आणणार असं विचारतात. राज्यसभेत अनिल देसाईंनी प्रायव्हेट बिल आणले आहे. त्यात त्यांनी दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सुविधा देणे बंद कराव्यात अशी मांडणी केली आहे. हा जवळजवळ समान नागरी कायदा झाला आहे. त्यांनी याविषयी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विचारले का ? असा अंतर्गत विरोध वाढत गेला तर सरकार टिकणार नाही आणि आम्ही सरकार स्थापन करणार नाही. तेव्हा मात्र फेरनिवडणूका होतील असे मला वाटते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण