शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

२०२४ ला बहुमतासाठी भाजपाला ८५-१०० जागा कमी पडतील; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 19:20 IST

तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - कितीही पैशांचा पाऊस पाडला, बंडखोर उभे केले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. राज्यात आजही लोकसभेच्या निवडणुका लागल्या तरी मविआत जागावाटपासंदर्भात काही अडचण येणार नाही. आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि विधानसभेत १८५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत बहुमतासाठी ८५-१०० जागा कमी पडतील असं देशात वातावरण आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार या प्रमुख राज्यातून भाजपाच्या भरपूर जागा कमी होतील. या जागा विरोधी पक्ष जिंकतील. मागच्यावेळी बिहारमध्ये नितीश कुमार भाजपासोबत होते. किमान तिथे २० जागा कमी झाल्या तरी भाजपाला किती मोठा फटका बसेल. महाराष्ट्रात जागा कमी होतील. प. बंगालमध्ये १८ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. आता १८ जागा जिंकणे कठीण आहे. तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले. 

मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केलीयशरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी कामाची नाही असं त्यांचे मत आहे. तिथे भाजपाचा अध्यक्ष असतो, सदस्य सत्ताधारी पक्षाचे जास्त असतात. पण आम्ही जेपीसीवर ठाम आहोत. पवारांविरोधात जाऊन आम्ही भूमिका मांडली. शरद पवार हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. सामनात काय लिहावं हे मला कुणी सांगितले नाही. मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केली आहे. बाळासाहेबांनी खासगीत माझे कान उपटले असते. अनेकदा त्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. पक्षाचे मुखपत्र असले तरी स्तंभातून मी माझी भूमिका मांडत असतो. अनेकदा शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीच्या बाजूने भूमिका मांडली तेव्हा कुणाला अडचण झाली नाही असं संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले. 

झुकायचं नाही हे ठरलंयआमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. आमचा हिंदुत्वाचा विचार, भूमिपूत्रांबद्दल विचार असेल ते कायम ठेऊन महाविकास आघाडीत आलोय. कुठल्याही परिस्थितीत झुकायचं नाही हे आम्ही ठरवलंय, बेकायदेशीरपणे पक्ष संपूर्ण चोरांच्या हाती दिला. आहे त्या संकटाला सामोरे जाऊन लढायचे. वाकायचे नाही हे ठरवले. फुटीर गटाचे नेतृत्व मी केले असते मी तुरुंगात गेलो नसतो. माझी मानसिकता जेलमध्ये राहण्याची होती. मी यातना करणार नाही हे मी ठरवले होते असंही राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा