शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ ला बहुमतासाठी भाजपाला ८५-१०० जागा कमी पडतील; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 19:20 IST

तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - कितीही पैशांचा पाऊस पाडला, बंडखोर उभे केले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. राज्यात आजही लोकसभेच्या निवडणुका लागल्या तरी मविआत जागावाटपासंदर्भात काही अडचण येणार नाही. आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि विधानसभेत १८५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत बहुमतासाठी ८५-१०० जागा कमी पडतील असं देशात वातावरण आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार या प्रमुख राज्यातून भाजपाच्या भरपूर जागा कमी होतील. या जागा विरोधी पक्ष जिंकतील. मागच्यावेळी बिहारमध्ये नितीश कुमार भाजपासोबत होते. किमान तिथे २० जागा कमी झाल्या तरी भाजपाला किती मोठा फटका बसेल. महाराष्ट्रात जागा कमी होतील. प. बंगालमध्ये १८ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. आता १८ जागा जिंकणे कठीण आहे. तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले. 

मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केलीयशरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी कामाची नाही असं त्यांचे मत आहे. तिथे भाजपाचा अध्यक्ष असतो, सदस्य सत्ताधारी पक्षाचे जास्त असतात. पण आम्ही जेपीसीवर ठाम आहोत. पवारांविरोधात जाऊन आम्ही भूमिका मांडली. शरद पवार हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. सामनात काय लिहावं हे मला कुणी सांगितले नाही. मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केली आहे. बाळासाहेबांनी खासगीत माझे कान उपटले असते. अनेकदा त्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. पक्षाचे मुखपत्र असले तरी स्तंभातून मी माझी भूमिका मांडत असतो. अनेकदा शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीच्या बाजूने भूमिका मांडली तेव्हा कुणाला अडचण झाली नाही असं संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले. 

झुकायचं नाही हे ठरलंयआमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. आमचा हिंदुत्वाचा विचार, भूमिपूत्रांबद्दल विचार असेल ते कायम ठेऊन महाविकास आघाडीत आलोय. कुठल्याही परिस्थितीत झुकायचं नाही हे आम्ही ठरवलंय, बेकायदेशीरपणे पक्ष संपूर्ण चोरांच्या हाती दिला. आहे त्या संकटाला सामोरे जाऊन लढायचे. वाकायचे नाही हे ठरवले. फुटीर गटाचे नेतृत्व मी केले असते मी तुरुंगात गेलो नसतो. माझी मानसिकता जेलमध्ये राहण्याची होती. मी यातना करणार नाही हे मी ठरवले होते असंही राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा