शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

'राज्यात १० मार्चनंतर भाजप सरकार'; मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलले; बाहेर येताच वेगळंच बोलून गेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:01 IST

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान

पुणे: राज्यातील सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा करणारं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व्यंकय्या नायडूंना लिहिलं. सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापर केला जात आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्र्यांवर, नेत्यांवर दबाव आणला जात आहे, अशा आशयाचं पत्र राऊत यांनी लिहिलं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल, असं विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

१० मार्चनंतर राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असं वक्तव्य पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलं. याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आपण तसं बोललो असं पाटील यांनी सांगितलं. 'कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. या परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यात भाजपचं सरकार येईल, असं म्हणालो,' असं पाटील यांनी सांगितलं.

सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांचे मेळावे सुरू आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा त्रास तळागाळातील कार्यकर्त्यांना होतो. त्यांनी त्यांची काळजी माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हा १० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपलं सरकार येईल, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी तसं बोलावं लागतं, असं पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा