शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला एकट्याने गाठायचा बहुमताचा आकडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 11:22 IST

युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा जोरात सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर महजानादेश यात्रात स्थिगीत करण्यात आली होती. परंतु, आता ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली असून भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची योजना केल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यासाठी अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहे. भाजपने देखील त्यांना प्रवेश दिला आहे. तर शिवसेनेकडून दावा करण्यात येणाऱ्या मतदारसंघात देखील भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेसोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाल्यास भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, यामुळे कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. याउलट भाजपची तयारी स्वबळावर बहुमत मिळविण्याची आहे. त्यासाठी उभय पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली आहे. त्यात भाजपच सध्या तरी आघाडीवर दिसत आहे.

राज्यात भाजपची ताकत शिवसेनेच्या तुलनेत वाढली आहे. याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे. तसेच युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप देईल तेवढ्या जागांवर शिवसेना समाधान मानण्याची शक्यता आहे.

सेनेची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा

युवेसेना प्रमुख आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेत त्यांनी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीनंतर आदित्य यांनी जन आशीर्वाद यात्रा थांबवली होती. त्यांची ही यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. यात्रेचा हा तिसरा टप्पा असणार आहे. यामुळे एकूणच युतीच्या भवितव्याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे.