शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला एकट्याने गाठायचा बहुमताचा आकडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 11:22 IST

युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा जोरात सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर महजानादेश यात्रात स्थिगीत करण्यात आली होती. परंतु, आता ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली असून भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची योजना केल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यासाठी अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहे. भाजपने देखील त्यांना प्रवेश दिला आहे. तर शिवसेनेकडून दावा करण्यात येणाऱ्या मतदारसंघात देखील भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेसोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाल्यास भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, यामुळे कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. याउलट भाजपची तयारी स्वबळावर बहुमत मिळविण्याची आहे. त्यासाठी उभय पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली आहे. त्यात भाजपच सध्या तरी आघाडीवर दिसत आहे.

राज्यात भाजपची ताकत शिवसेनेच्या तुलनेत वाढली आहे. याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे. तसेच युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप देईल तेवढ्या जागांवर शिवसेना समाधान मानण्याची शक्यता आहे.

सेनेची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा

युवेसेना प्रमुख आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेत त्यांनी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीनंतर आदित्य यांनी जन आशीर्वाद यात्रा थांबवली होती. त्यांची ही यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. यात्रेचा हा तिसरा टप्पा असणार आहे. यामुळे एकूणच युतीच्या भवितव्याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे.