शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला एकट्याने गाठायचा बहुमताचा आकडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 11:22 IST

युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा जोरात सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर महजानादेश यात्रात स्थिगीत करण्यात आली होती. परंतु, आता ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली असून भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची योजना केल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यासाठी अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहे. भाजपने देखील त्यांना प्रवेश दिला आहे. तर शिवसेनेकडून दावा करण्यात येणाऱ्या मतदारसंघात देखील भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेसोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाल्यास भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, यामुळे कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. याउलट भाजपची तयारी स्वबळावर बहुमत मिळविण्याची आहे. त्यासाठी उभय पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली आहे. त्यात भाजपच सध्या तरी आघाडीवर दिसत आहे.

राज्यात भाजपची ताकत शिवसेनेच्या तुलनेत वाढली आहे. याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे. तसेच युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप देईल तेवढ्या जागांवर शिवसेना समाधान मानण्याची शक्यता आहे.

सेनेची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा

युवेसेना प्रमुख आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेत त्यांनी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीनंतर आदित्य यांनी जन आशीर्वाद यात्रा थांबवली होती. त्यांची ही यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. यात्रेचा हा तिसरा टप्पा असणार आहे. यामुळे एकूणच युतीच्या भवितव्याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे.