शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

“महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:20 IST

Vinod Tawde News: इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

Vinod Tawde News: अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपशासित राज्यांची संख्याही वाढली आहे. याचा मोठा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याची जय्यत तयारी भाजपाने सुरू केली आहे. पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी आणि राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून गेलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर विनोद तावडे यांनी सूचक भाष्य केले.

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत. पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना विनोद तावडे यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपाला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे. या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे. या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय आहे. आपण अजूनही शिकत आहोत आणि काम करीत आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’

महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि २०२४ मधील मुख्यमंत्रीपदाबाबत विनोद तावडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तुम्हाला अभिमान वाटायला हवा की, आमचा मराठी माणूस दिल्लीत काम करतोय. सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही. सध्या ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’, असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. तसेच इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही असे सांगितले आहे. मग जागा राहिल्या कुठे? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच कॉंगेसच्या खासदार साहू यांच्यावरील कारवाईनंतर कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट आहे असे वाटत नाही, असे विनोद तावडे म्हणाले. 

दरम्यान, भाजपाने चार राज्यात नवीन चेहरे दिले आहेत. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन टर्मचे आमदार आहेत. मोहन यादव यादव असण्यापेक्षा ते कार्यकर्ते आहेत. प्रस्थापित नाव सोडून ते नाव का आले असेल असे वाटत असेल. पण पक्षाने दिलेले काम करावे लागेल हे लक्षात असले पाहिजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रीय आहेत आणि केंद्रात देखील त्याचे काम दिसते. महाराष्ट्र पॅटर्न कसेल ते मी ठरवित नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे