शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:20 IST

Vinod Tawde News: इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

Vinod Tawde News: अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपशासित राज्यांची संख्याही वाढली आहे. याचा मोठा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याची जय्यत तयारी भाजपाने सुरू केली आहे. पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी आणि राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून गेलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर विनोद तावडे यांनी सूचक भाष्य केले.

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत. पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना विनोद तावडे यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपाला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे. या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे. या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय आहे. आपण अजूनही शिकत आहोत आणि काम करीत आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’

महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि २०२४ मधील मुख्यमंत्रीपदाबाबत विनोद तावडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तुम्हाला अभिमान वाटायला हवा की, आमचा मराठी माणूस दिल्लीत काम करतोय. सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही. सध्या ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’, असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. तसेच इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही असे सांगितले आहे. मग जागा राहिल्या कुठे? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच कॉंगेसच्या खासदार साहू यांच्यावरील कारवाईनंतर कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट आहे असे वाटत नाही, असे विनोद तावडे म्हणाले. 

दरम्यान, भाजपाने चार राज्यात नवीन चेहरे दिले आहेत. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन टर्मचे आमदार आहेत. मोहन यादव यादव असण्यापेक्षा ते कार्यकर्ते आहेत. प्रस्थापित नाव सोडून ते नाव का आले असेल असे वाटत असेल. पण पक्षाने दिलेले काम करावे लागेल हे लक्षात असले पाहिजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रीय आहेत आणि केंद्रात देखील त्याचे काम दिसते. महाराष्ट्र पॅटर्न कसेल ते मी ठरवित नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे