शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

“महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:20 IST

Vinod Tawde News: इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

Vinod Tawde News: अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपशासित राज्यांची संख्याही वाढली आहे. याचा मोठा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याची जय्यत तयारी भाजपाने सुरू केली आहे. पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी आणि राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून गेलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर विनोद तावडे यांनी सूचक भाष्य केले.

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत. पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना विनोद तावडे यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपाला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे. या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे. या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय आहे. आपण अजूनही शिकत आहोत आणि काम करीत आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’

महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि २०२४ मधील मुख्यमंत्रीपदाबाबत विनोद तावडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तुम्हाला अभिमान वाटायला हवा की, आमचा मराठी माणूस दिल्लीत काम करतोय. सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही. सध्या ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’, असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. तसेच इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही असे सांगितले आहे. मग जागा राहिल्या कुठे? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच कॉंगेसच्या खासदार साहू यांच्यावरील कारवाईनंतर कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट आहे असे वाटत नाही, असे विनोद तावडे म्हणाले. 

दरम्यान, भाजपाने चार राज्यात नवीन चेहरे दिले आहेत. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन टर्मचे आमदार आहेत. मोहन यादव यादव असण्यापेक्षा ते कार्यकर्ते आहेत. प्रस्थापित नाव सोडून ते नाव का आले असेल असे वाटत असेल. पण पक्षाने दिलेले काम करावे लागेल हे लक्षात असले पाहिजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रीय आहेत आणि केंद्रात देखील त्याचे काम दिसते. महाराष्ट्र पॅटर्न कसेल ते मी ठरवित नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे