शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 13:15 IST

शिवसेना-भाजपा एकत्र आले असते, तर सत्तास्थापनेचा काही प्रश्नच नव्हता. परंतु त्यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुतच आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेली गोवा विधानसभेची निवडणूक... १७ जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर  १३ जागांवर भाजपाचं 'कमळ' फुललं होतं... बहुमतासाठी हव्या होत्या २१ जागा... चार आमदार सहज मिळवता येईल, या 'ओव्हर कॉन्फिडन्स'नं काँग्रेसचा घात केला... अमित शहा-नितीन गडकरी यांनी एका रात्रीत आठ आमदारांचं गणित जमवलं आणि काँग्रेसच्या 'हाता'तून सत्तेचा घास हिरावून घेतला... या अनुभवातून काँग्रेस नेते भविष्यात शहाणे झाले, पण शिवसेना नेते बहुधा हा गोवा पॅटर्न विसरूनच गेले होते. या 'पॅटर्न'मुळेच अहमदनगरमध्ये त्यांचं सत्तेचं स्वप्न भंगलं आहे.  

१० डिसेंबरला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी धुळ्यात भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं, पण नगरमध्ये बराच वेळ आघाडीवर असलेली भाजपा हळूहळू मागे पडली होती आणि 'मोठा भाऊ' होता होता, 'छोटा भाऊ' ठरली होती. नगरमध्ये अपेक्षेप्रमाणे 'त्रिशंकू' निकाल लागला होता. शिवसेनेनं सर्वाधिक २४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाला १४ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. ६८ सदस्यांच्या नगर महापालिकेत बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक होत्या. राष्ट्रवादीकडे १८ नगरसेवक होते, तर काँग्रेसचे ५ शिलेदार विजयी झाले होते. त्यामुळे 'मॅजिक फिगर' कोण, कशी गाठणार आणि महापौरपदाची खुर्ची कोण पटकावणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

शिवसेना-भाजपा एकत्र आले असते, तर सत्तास्थापनेचा काही प्रश्नच नव्हता. परंतु, त्यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुतच आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे हे दोन मित्र इथेही दंड थोपटून आमनेसामने उभे ठाकले होते. शिवसेनेसाठी हे गणित जमवणं तुलनेनं सोपं होतं. पण, रोजच टीकेचे बाण सोडणाऱ्या सेनेला हिसका दाखवण्याचा निर्धारच भाजपाने केला होता. त्यामुळे, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, या उक्तीनुसार त्यांनी राष्ट्रवादीकडे 'टाळी' मागितली. ही संधी राष्ट्रवादीने सोडण्याचा प्रश्नच नव्हता. सुरुवातीला अडचणीच्या काळात देवेंद्र सरकारलाही 'आधार' देणाऱ्या 'घड्याळा'नं यावेळी आनंदानं भाजपाचा गजर केला. त्यांच्यासोबतच, बहुजन समाज पार्टीच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकालाही भाजपानं आपल्या सोबत घेतलं. या सगळ्या बेरजेमुळेच आज ३७ मतं मिळवून भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले. आणखी एका महापालिकेवर कमळ फुललं. 

शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी फारसे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामागे त्यांचं काही वेगळं गणित होतं का, भाजपा-राष्ट्रवादी युतीवर आता ते काय भूमिका घेतात, त्याचा प्रचारात वापर करतात का, नगरमधील राजकारणाचा देश आणि राज्य पातळीवर कसा परिणाम होणार, असे अनेक प्रश्न या महापौर निवडणुकीमुळे निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं फारच रंजक असतील, हे मात्र नक्की. 

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकAhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा