शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:16 IST

BJP Union Minister Narayan Rane News: ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

BJP Union Minister Narayan Rane News: दोन दिवस दिवसभर वादळी आणि प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सही झाली. त्यामुळे हा आता कायदा बनला आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून राजकीय वर्तुळातही दावे-प्रतिदावे केले करण्यात येत असून, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहेय

वक्फ बोर्ड विधेयकात काही चांगल्या सुधारणा आहेत. अफरातफरीला पायबंद बसून पारदर्शकता आली पाहिजे. पण, काही गोष्टी भाजप उकरून काढत आहे. फटाक्याची वात पेटवून पळून जायचे. ते फुटून झाले की मिरवायला यायचे, ही भाजपची वाईट सवय आहे. आम्हीच सगळे काही केले या वृत्तीचा आम्ही विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना काही देणार आहे त्या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपासह महायुतीतील नेते ठाकरे गटावर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. यातच आता नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले.

दरम्यान, रामनवमी आहे, सोबत भाजपाचा स्थापना दिवस आहे, त्या निमित्ताने मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे,  तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या  नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे. आता विरोधकांकडे दुसरे काम राहिलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डNarayan Raneनारायण राणे Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे