शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:16 IST

BJP Union Minister Narayan Rane News: ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

BJP Union Minister Narayan Rane News: दोन दिवस दिवसभर वादळी आणि प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सही झाली. त्यामुळे हा आता कायदा बनला आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून राजकीय वर्तुळातही दावे-प्रतिदावे केले करण्यात येत असून, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहेय

वक्फ बोर्ड विधेयकात काही चांगल्या सुधारणा आहेत. अफरातफरीला पायबंद बसून पारदर्शकता आली पाहिजे. पण, काही गोष्टी भाजप उकरून काढत आहे. फटाक्याची वात पेटवून पळून जायचे. ते फुटून झाले की मिरवायला यायचे, ही भाजपची वाईट सवय आहे. आम्हीच सगळे काही केले या वृत्तीचा आम्ही विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना काही देणार आहे त्या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपासह महायुतीतील नेते ठाकरे गटावर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. यातच आता नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले.

दरम्यान, रामनवमी आहे, सोबत भाजपाचा स्थापना दिवस आहे, त्या निमित्ताने मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे,  तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या  नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे. आता विरोधकांकडे दुसरे काम राहिलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डNarayan Raneनारायण राणे Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे