शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“अमित शाहांसोबत २० मिनिटे चर्चा, निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला”: रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:15 IST

BJP Raosaheb Danve News: मातोश्रीवर त्यावेळेस नेमके काय घडले, याबाबत सविस्तर सांगताना रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

BJP Raosaheb Danve News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. मेळावे, बैठकांचे सत्र सुरू आहे. एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अमित शाहांवर टीका करत, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे शपथेवर म्हटले आहे. यावरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून देण्यात आलेल्या शब्दाबाबत जे भाष्य केले, त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी मातोश्रीवर नेमके काय घडले, हे रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. जागावाटपाची चर्चा झाली, त्यावेळी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. चर्चेसाठी अमित शाह यांच्यासह मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेलो होतो. शिवसेनेचे काही पदाधिकारी आले होते. मातोश्रीवर चर्चा आणि चहापाणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहजपणे अमित शाह यांना म्हणाले की, आपण जरा आत बसू. ते आत गेले आणि २० मिनिटे चर्चा केली. बाहेर आल्यावर ते एवढेच म्हणाले की, आमचे ठरले आहे आपण आता पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषदेत कुणी किती जागा लढवायच्या, तसेच लोकसभा आणि विधानसभेत आमची युती राहणार एवढेच बोलायचे ठरले होते, अशी माहिती दानवे यांनी दिली. 

द्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. प्रचारादरम्यान भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान केले. कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने त्यावेळी आक्षेप घेतला नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही कधी याबाबत वाच्यता केली नाही. २०१९ चा निकाल लागल्यानंतर माझ्याशिवाय सरकार बनणार नाही, असे जेव्हा चित्र दिसले, तेव्हा उद्धव ठाकरेंची भाषा अचानक बदलली. त्याच्या अगोदर ते कधीही त्यापद्धतीने बोलले नव्हते. आमची शिवसेनेबरोबरची युती २५ वर्षांपासूनची होती. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला, या शब्दांत दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना, महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकेरी आकड्यात जागा दिल्या जातील, या बातम्या निराधार आहेत. भाजपाच्या कोणत्या जबाबदार नेत्याने एक आकडी जागा देऊ, असे म्हटलेले नाही. आमची एकत्रित बैठक झाल्यानंतर सन्मानपूर्वक जागावाटप केले जाईल, त्यामुळे कुणालाही नाराज होण्याची गरज नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे