शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुंबईतील मनसेच्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविली : सुषमा अंधारेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 10:58 IST

नागरिकत्व कायद्याला सोलापुरात विरोध; संविधान बचाओ आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग

ठळक मुद्देसीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात संविधान बचाओ कृती समितीतर्फे महिला आंदोलनसुषमा अंधारे यांनी भाजप तसेच राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केलीराज ठाक रेंनी लोकांची माथी भडकविण्याचे काम करु नये : प्रा. सुषमा अंधारे

सोलापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण आता संपलेले आहे. त्यांनी लोकांची माथी भडकविण्याचे काम करु नये, असे म्हणताना काही दिवसांपूर्वी त्यांनी काढलेल्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी सोलापुरात केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात संविधान बचाओ कृती समितीतर्फे महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनात उपस्थित सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, तलवारीबद्दल राज ठाकरे तुम्ही बोलू नकात. तलवारीविषयी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बोलावे. महाराजांचे मावळे हे मुस्लीम, आलुतेदार, बलुतेदार असे सर्व समाजातील होते. जे खºया अर्थाने शिवरायांचे विचार पुढे नेतात. त्यांनाच बोलायचा अधिकार आहे.  निवडणुकांपूर्वी लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता काय झाले तुम्हाला ?. राज ठाकरे हे ‘बंद कर रे तो व्हिडीओ..उचल तो दगड’ असे फक्त चर्चेत राहण्यासाठी करतात.

वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्यक्षात रोजगार दिलाच नाही. देशात अनेकजण बेरोजगार आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारु नये, यासाठी हा खटाटोप आहे. धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मतदान कार्डामुळे तुम्ही निवडून आलात त्या मतदान कार्डाला अवैध ठरवत आहात. या विरोधात मुस्लीमच नाही तर इतर लोकही काम करत आहेत.

अल्पसंख्याकांनी भाजपपासून वेगळे व्हावे- न्यायालयाने चार आठवड्याचा वेळ दिला आहे.  हे तीन आठवडे संयमाची परीक्षा पाहणारे आहेत. सर्व स्त्रियांनी तीन आठवडे आंदोलन अजून चालवायचे आहे़ पुढच्या टप्प्यामध्ये मुख्य चौकात बोर्डावर स्वाक्षरी अभियान घेऊ. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी चौकात येऊन पाठिंबा द्यावा. ज्या भाजपने नागरिकत्व संशोधन कायदा बनविला. त्या पक्षासोबत अल्पसंख्याक लोक जे  खासदार, आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, तालुका पंचायतीत असतील त्यांनी भाजपतून बाहेर पडून आंदेलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रा. अंधारे यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा