शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"मालेगावच्या सभेत डरकाळी फोडून घरी आल्यावर..."; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:39 IST

सावरकरांचा खरा इतिहास डोळ्यात अश्रू आणणारा आहे. हा लोकांसमोर आणला पाहिजे असं बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबई - मालेगावच्या सभेत डरकाळी फोडल्यावर आम्हाला वाटले उद्धव ठाकरे घरी येतील, राहुल गांधींच्या फोटोला चपलेने मारतील आणि दाखवतील. पण सकाळी ९ चा भोंगा वाजला. आम्ही राहुल गांधींशी बोलू, ३ वर्षात ५ वेळा सावरकरांचा अपमान केला तेव्हा का बोलले नाहीत. किती दिवस महाराष्ट्राने सावरकरांचा अपमान सहन करायचा असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपा-शिवसेना म्हणून युतीने प्रत्येक विधानसभेत, जिल्ह्यात ५०० वीर सावरकर गौरव यात्रा काढायची. युवा पिढीला सावरकरांचा इतिहास माहिती होईल त्यानंतर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही यासाठी आम्ही यात्रा काढणार आहोत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या ३ वर्षापासून राहुल गांधी अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत अपमानास्पद टिप्पणी करायला लागले. रत्नागिरीत सावरकरांना ज्या जेलमध्ये बंद केले, अंदमानात गेले तेथील जेल पाहिले तर आजही अस्वस्थ व्हायला लागते. १४ वर्षे इंग्रजांविरोधात जेलमध्ये राहणे या इतिहासाला राहुल गांधी मान्य करत नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच दुसरीकडे स्व. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यरच्या प्रतिमेला जोडे मारले होते. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही पण काँग्रेससोबत राहू अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. सावरकरांचा अपमान झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी सातत्याने सावरकरांचा अपमान करतायेत. सावरकरांचा इतिहास दाबून टाकायचा हे राहुल गांधीचे काम आहे असा आरोप बावनकुळेंनी केला. लोकमत ऑनलाईनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

पाहा व्हिडिओ - 

दरम्यान, सावरकरांचा खरा इतिहास डोळ्यात अश्रू आणणारा आहे. हा लोकांसमोर आणला पाहिजे. वीर सावरकर स्वातंत्र्याकरिता इंग्रजाविरोधात लढले. संपूर्ण आयुष्य वेचले. महाराष्ट्रातील कुठलीही जनता सावरकरांवर आक्षेप घेणार नाही. राज्यातील जनतेचे मूळ आम्हाला माहिती आहे. ही जनता स्वातंत्र्यवीरांच्या पाठिशी आहे. ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातील त्याच्याविरोधात आम्ही राहू असं बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधी