शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

“वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 17:27 IST

BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना रामकृष्ण हरी हा जयघोष रुचलाच नसता, अशी टीका भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर केली.

BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्व काही देवाचरणी अर्पण होत असते. ही वारी घेऊन संतांच्या पालख्यांसह लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले. विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे मन तृप्त झाले. यातच वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का, अशी विचारणा भाजपाने केली आहे. 

यंदाच्या वारीत शरद पवार सहभागी होणार असल्याचे सांगितले गेले होते. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी राहुल गांधी विठूरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शरद पवार वारीत दिसले नाहीत तसेच राहुल गांधी पंढरपुरात गेले नाहीत, यावरून भाजपाने या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. भाजपाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. शेवटी ते वारीला आलेच नाहीत, असे सांगत भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

शेवटी ते वारीला आलेच नाहीत...

शेवटी ते वारीला आलेच नाहीत. वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारमुळे  निवडून आले आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. यापूर्वी विठूरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधी यांनी वारीचे आमंत्रण स्वीकारून वारीत सहभागी घेतला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला. हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली, मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे. 

दरम्यान, वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी, तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता, असा हल्लाबोल भाजपाने केला.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022BJPभाजपाSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी