शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:41 IST

राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

सांगली - राज्यात शिवसेना-भाजपा सरकारमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात मंगळवारी विविध वृत्तपत्रात झळकलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. या जाहिरातीत सर्व्हेच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपाने त्यांचे ऐकावे आणि एकनाथ शिंदेंना भाजपाने पूर्ण नेतृत्व द्यावं. त्यांच्या पक्षाने ७० ,८०, ९० जागा मागितल्या आहेत. त्यांना तेवढ्या द्याव्यात अशी आमची उपसूचना आहे असं पाटलांनी भाजपा-शिंदे गटावर खोचक टीका केली. 

जिथं विरोधी पक्षाची ताकद जास्त, तिथं दंगली घडवल्या जातायेत गेल्या तीनशे वर्षात ब्रिटिश आणि मुघलांच्या काळातही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांच्यावर हल्ला झाला आहे. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे, ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते आहे. असा आरोपी जयंत पाटील यांनी केला आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. जातीय तणाव वाढणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी, ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. 

सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, नगर अशी ठिकाणी हे होत असताना हा पॅटर्न वापरला जात असल्याची शंका येते. कोल्हापूरसारख्या शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे अशा ठिकाणी दंगल होते हे शंकास्पद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादी बैठक बोलवावी, आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. सोशल मिडीयाच्या फेक अकाउंट बाबत गांभीर्याने विचार करावा, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा