शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:41 IST

राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

सांगली - राज्यात शिवसेना-भाजपा सरकारमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात मंगळवारी विविध वृत्तपत्रात झळकलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. या जाहिरातीत सर्व्हेच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपाने त्यांचे ऐकावे आणि एकनाथ शिंदेंना भाजपाने पूर्ण नेतृत्व द्यावं. त्यांच्या पक्षाने ७० ,८०, ९० जागा मागितल्या आहेत. त्यांना तेवढ्या द्याव्यात अशी आमची उपसूचना आहे असं पाटलांनी भाजपा-शिंदे गटावर खोचक टीका केली. 

जिथं विरोधी पक्षाची ताकद जास्त, तिथं दंगली घडवल्या जातायेत गेल्या तीनशे वर्षात ब्रिटिश आणि मुघलांच्या काळातही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांच्यावर हल्ला झाला आहे. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे, ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते आहे. असा आरोपी जयंत पाटील यांनी केला आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. जातीय तणाव वाढणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी, ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. 

सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, नगर अशी ठिकाणी हे होत असताना हा पॅटर्न वापरला जात असल्याची शंका येते. कोल्हापूरसारख्या शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे अशा ठिकाणी दंगल होते हे शंकास्पद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादी बैठक बोलवावी, आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. सोशल मिडीयाच्या फेक अकाउंट बाबत गांभीर्याने विचार करावा, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा