शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:44 IST

भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

 अमरावती - नशिबावर कोणताच पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. ज्या पक्षाजवळ संघटन त्यांचीच सरशी होण्याचा हा काळ आहे. पक्षाद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्याने भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २७ आॅक्टोबरपासून ४८ मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाला लावायला लावण्यासाठी जिल्हानिहाय दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले. लाट होती म्हणून पराभव झाल्याचे विरोधक सांगत असले तरी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात, देशात सत्ता असली की पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होते. मात्र, भाजपाची संघटनात्मक वाटचालदेखील तेवढ्याच सक्षमपणे सुरू असल्याचे दानवे म्हणाले. विधानसभेसाठी २८८ विस्तारक पूर्णवेळ काम करीत आहेत. याव्यतिरीक्त ४८ विस्तारक स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. यापैकी ८८ हजार बुथपर्यंत आम्ही वॉररूमच्या माध्यमातून पोहोचलो असल्याचे दानवे म्हणाले. पत्रपरिषदेला आ. अरूण अडसड, आ. सुनील देशमुख, आ, अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ, रामदास आंबटकर, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

 दिवाळीनंतर नाफेडची खरेदी सुरू युतीची चर्चा झाली नसली तरी मित्रपक्ष शिवसेना सोबतच राहावी, असा आमचा प्रयत्न आहे. अमरावती येथे संघटनात्मक आढावा घेत आहो. आमचे काम वाढले तरी युती झाल्यास याचा मित्रपक्षालाच फायदा होईल. कर्जमाफीसाठी व्यक्ती हा घटक गृहीत न धरता कुटुंब हा घटक गृहीत धरण्यात येत असल्याने अधिकाधिक शेतक-यांना याचा लाभ होणार आहे. ९९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. दिवाळी पश्चात सोयाबीनची नाफेड खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही, रावसाहेब दानवे यांनी दिली.

 अमरावतीचा उमेदवार संसदीय बोर्ड ठरविणार अमरावती लोकसभा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपाच्या उमेदवार  सीमा सावळे असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केल्याची विचारणा केली असता दानवे म्हणाले, भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. केंद्रीय पार्लमेंट्री समिती उमेदवार निश्चित करते. राममंदीराचा मुद्दा शिवसेनेने हायजॅक केला काय, अशी विचारणा केली असता, याविषयी शिवसेनेचे आम्ही स्वागतच करतो. राफेलचा करार काँग्रेसच्या काळात जाला अम्ही कमी दराने केला असल्याचे दानवे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे