शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:00 IST

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक आयारामांना जनतेने सपशेल नाकारले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून अनेक दिग्गज नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले. सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जावून या नेत्यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे नियोजन केले होते. मात्र यातील अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील काही नेत्यांनी असलेल्या पक्षातून विजय निश्चित असताना देखील पक्षांतराचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या पक्षांतराच्या निर्णयाला जनतेने नाकारले आहे.   

उदयनराजेंचा निर्णय फसलासातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीचा खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याविरुद्ध राजेंना पराभव पत्करावा लागला. खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असताना उदयनराजे यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यांना साताऱ्यातील जनतेने धक्का दिला.

रश्मी बागल यांचा भ्रमनिरासराष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी सर्वांनाच धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला होता. वास्तविक पाहता करमाळ्यात शिवसेनेचेच आमदार नारायण पाटील 2014 मध्ये विजयी झाले होते. तरी देखील विकासासाठी आपण सेनेत जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांनाच आता शिवसेनेच्या तिकीटावर पराभव पत्करावा लागला.

वैभव पिचडही पराभूतराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत पिचड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदार संघातून आघाडी मिळवून दिली होती. तरी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. आता मात्र त्यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले.

जयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणूक सहा महिन्यांवर असताना शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने देखील बीडमध्ये पक्ष वाढविण्याच्या उद्देशाने क्षीरसागरांना मंत्रीपद देऊऩ विधानसभेची उमेदवारीही दिली. मात्र पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून जयदत्त यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे क्षीरसागरांचा शिवसेना प्रवेशही फसल्याचे स्पष्ट झाले.

हर्षवर्धन पाटीलकाँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून तिकीट मिळत नसल्याचे पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली. मात्र तेथून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्र्यय भरणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे.