शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:00 IST

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक आयारामांना जनतेने सपशेल नाकारले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून अनेक दिग्गज नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले. सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जावून या नेत्यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे नियोजन केले होते. मात्र यातील अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील काही नेत्यांनी असलेल्या पक्षातून विजय निश्चित असताना देखील पक्षांतराचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या पक्षांतराच्या निर्णयाला जनतेने नाकारले आहे.   

उदयनराजेंचा निर्णय फसलासातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीचा खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याविरुद्ध राजेंना पराभव पत्करावा लागला. खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असताना उदयनराजे यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यांना साताऱ्यातील जनतेने धक्का दिला.

रश्मी बागल यांचा भ्रमनिरासराष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी सर्वांनाच धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला होता. वास्तविक पाहता करमाळ्यात शिवसेनेचेच आमदार नारायण पाटील 2014 मध्ये विजयी झाले होते. तरी देखील विकासासाठी आपण सेनेत जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांनाच आता शिवसेनेच्या तिकीटावर पराभव पत्करावा लागला.

वैभव पिचडही पराभूतराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत पिचड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदार संघातून आघाडी मिळवून दिली होती. तरी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. आता मात्र त्यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले.

जयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणूक सहा महिन्यांवर असताना शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने देखील बीडमध्ये पक्ष वाढविण्याच्या उद्देशाने क्षीरसागरांना मंत्रीपद देऊऩ विधानसभेची उमेदवारीही दिली. मात्र पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून जयदत्त यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे क्षीरसागरांचा शिवसेना प्रवेशही फसल्याचे स्पष्ट झाले.

हर्षवर्धन पाटीलकाँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून तिकीट मिळत नसल्याचे पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली. मात्र तेथून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्र्यय भरणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे.