शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:32 IST

मुख्यमंत्री फडणवीस, रावते राज्यपालांना भेटले, उद्या निवडणार भाजपा विधिमंडळ पक्षनेता

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘सत्तासंघर्ष’ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तत्पूर्वी ‘५०-५० फॉर्म्युल्या’वर भाजपाने सत्य बोलावे, असे आवाहन शिवसेनेने केले. दरम्यान, शिवसेना आपल्या मुखपत्रातून करीत असलेली टीका थांबवणार नाही तोपर्यंत या पक्षासोबत चर्चा नाहीच, अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे. नवा नेता निवडण्यासाठी ३० ऑक्टोबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.

तथापि दोन्ही नेत्यांची ही भेट केवळ ‘औपचारिक भेट’ होती, असे राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. फडणवीस आणि रावते राज्यपालांशी वेगवेगळे भेटले. फडणवीस सकाळी ११ वाजता राजभवन येथे पोहोचले. त्यानंतर रावते राजभवनवर आले.२८८ सदस्यीय विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला १०५ व शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला, तर राष्ट्रवादीने ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.

पूर्ण बहुमतासह स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे लक्ष्य होते. परंतु १०५ जागा जिंकता आल्याने भाजपाला मोठा हादरा बसला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे मनोबल उंचावले आणि आणि त्यामुळेच शिवसेना आता ‘५०-५० फॉर्म्युला’ अमलात आणण्यावर जोर देत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबत झालेल्या आपल्या बैठकीत ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. त्यावर आता अमल करण्यात यावा, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधी ‘सत्तेत समसमान वाटा’ ठेवण्याचे लेखी आश्वासन भाजपाने द्यावे, अशी मागणी शिवसेनेने शनिवारीच केली होती. तत्पूर्वी आर्थिक मंदीवरून शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर प्रखर टीका केली. ‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’, असे म्हणत शिवसेनेने भारतीय बाजारपेठेतील मंदीवर भाष्य केले. शिवसेनेच्या मुखपत्रातील हा लेख आणि खा. राऊत यांचे भाष्य यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीपूर्वीच भाजपा-शिवसेनेत कटुता निर्माण झाली आहे, असे मत एका भाजपा नेत्याने व्यक्त केले.खरे बोला-राऊतसत्तेत समान वाटा देण्याच्या मागणीचा शिवसेनेने सोमवारी पुनरुच्चार केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या ‘५०-५० फार्म्युल्या’बद्दल भाजपाने खरे सांगावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. रावते राज्यपाल कोश्यारी यांना भेटले. पण या भेटीत राजकीय असे काही नाही, असे राऊत म्हणाले. सत्तेत समान वाटा देण्यास भाजपाने नकार दिला तर काय होईल, असे विचारले असता राऊत म्हणाले,‘भाजपाने रामाच्या नावावर मते मागितली. आता तुम्ही (भाजपा) राममंदिरही बांधणार आहात. राम ‘सत्यवचनी’ होता. त्यामुळे भाजपाने आता यावर (५०-५० फॉर्म्युला) खरे बोलले पाहिजे. तुम्हाला कागद फाडता येईल; पण रेकॉर्ड (भाजपा-शिवसेनेत झालेला समान सत्ता वाटपाचा करार) डिलिट करता येणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDiwakar Raoteदिवाकर रावते