शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:32 IST

मुख्यमंत्री फडणवीस, रावते राज्यपालांना भेटले, उद्या निवडणार भाजपा विधिमंडळ पक्षनेता

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘सत्तासंघर्ष’ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तत्पूर्वी ‘५०-५० फॉर्म्युल्या’वर भाजपाने सत्य बोलावे, असे आवाहन शिवसेनेने केले. दरम्यान, शिवसेना आपल्या मुखपत्रातून करीत असलेली टीका थांबवणार नाही तोपर्यंत या पक्षासोबत चर्चा नाहीच, अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे. नवा नेता निवडण्यासाठी ३० ऑक्टोबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.

तथापि दोन्ही नेत्यांची ही भेट केवळ ‘औपचारिक भेट’ होती, असे राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. फडणवीस आणि रावते राज्यपालांशी वेगवेगळे भेटले. फडणवीस सकाळी ११ वाजता राजभवन येथे पोहोचले. त्यानंतर रावते राजभवनवर आले.२८८ सदस्यीय विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला १०५ व शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला, तर राष्ट्रवादीने ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.

पूर्ण बहुमतासह स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे लक्ष्य होते. परंतु १०५ जागा जिंकता आल्याने भाजपाला मोठा हादरा बसला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे मनोबल उंचावले आणि आणि त्यामुळेच शिवसेना आता ‘५०-५० फॉर्म्युला’ अमलात आणण्यावर जोर देत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबत झालेल्या आपल्या बैठकीत ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. त्यावर आता अमल करण्यात यावा, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधी ‘सत्तेत समसमान वाटा’ ठेवण्याचे लेखी आश्वासन भाजपाने द्यावे, अशी मागणी शिवसेनेने शनिवारीच केली होती. तत्पूर्वी आर्थिक मंदीवरून शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर प्रखर टीका केली. ‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’, असे म्हणत शिवसेनेने भारतीय बाजारपेठेतील मंदीवर भाष्य केले. शिवसेनेच्या मुखपत्रातील हा लेख आणि खा. राऊत यांचे भाष्य यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीपूर्वीच भाजपा-शिवसेनेत कटुता निर्माण झाली आहे, असे मत एका भाजपा नेत्याने व्यक्त केले.खरे बोला-राऊतसत्तेत समान वाटा देण्याच्या मागणीचा शिवसेनेने सोमवारी पुनरुच्चार केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या ‘५०-५० फार्म्युल्या’बद्दल भाजपाने खरे सांगावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. रावते राज्यपाल कोश्यारी यांना भेटले. पण या भेटीत राजकीय असे काही नाही, असे राऊत म्हणाले. सत्तेत समान वाटा देण्यास भाजपाने नकार दिला तर काय होईल, असे विचारले असता राऊत म्हणाले,‘भाजपाने रामाच्या नावावर मते मागितली. आता तुम्ही (भाजपा) राममंदिरही बांधणार आहात. राम ‘सत्यवचनी’ होता. त्यामुळे भाजपाने आता यावर (५०-५० फॉर्म्युला) खरे बोलले पाहिजे. तुम्हाला कागद फाडता येईल; पण रेकॉर्ड (भाजपा-शिवसेनेत झालेला समान सत्ता वाटपाचा करार) डिलिट करता येणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDiwakar Raoteदिवाकर रावते