शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:32 IST

मुख्यमंत्री फडणवीस, रावते राज्यपालांना भेटले, उद्या निवडणार भाजपा विधिमंडळ पक्षनेता

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘सत्तासंघर्ष’ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तत्पूर्वी ‘५०-५० फॉर्म्युल्या’वर भाजपाने सत्य बोलावे, असे आवाहन शिवसेनेने केले. दरम्यान, शिवसेना आपल्या मुखपत्रातून करीत असलेली टीका थांबवणार नाही तोपर्यंत या पक्षासोबत चर्चा नाहीच, अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे. नवा नेता निवडण्यासाठी ३० ऑक्टोबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.

तथापि दोन्ही नेत्यांची ही भेट केवळ ‘औपचारिक भेट’ होती, असे राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. फडणवीस आणि रावते राज्यपालांशी वेगवेगळे भेटले. फडणवीस सकाळी ११ वाजता राजभवन येथे पोहोचले. त्यानंतर रावते राजभवनवर आले.२८८ सदस्यीय विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला १०५ व शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला, तर राष्ट्रवादीने ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.

पूर्ण बहुमतासह स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे लक्ष्य होते. परंतु १०५ जागा जिंकता आल्याने भाजपाला मोठा हादरा बसला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे मनोबल उंचावले आणि आणि त्यामुळेच शिवसेना आता ‘५०-५० फॉर्म्युला’ अमलात आणण्यावर जोर देत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबत झालेल्या आपल्या बैठकीत ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. त्यावर आता अमल करण्यात यावा, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधी ‘सत्तेत समसमान वाटा’ ठेवण्याचे लेखी आश्वासन भाजपाने द्यावे, अशी मागणी शिवसेनेने शनिवारीच केली होती. तत्पूर्वी आर्थिक मंदीवरून शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर प्रखर टीका केली. ‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’, असे म्हणत शिवसेनेने भारतीय बाजारपेठेतील मंदीवर भाष्य केले. शिवसेनेच्या मुखपत्रातील हा लेख आणि खा. राऊत यांचे भाष्य यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीपूर्वीच भाजपा-शिवसेनेत कटुता निर्माण झाली आहे, असे मत एका भाजपा नेत्याने व्यक्त केले.खरे बोला-राऊतसत्तेत समान वाटा देण्याच्या मागणीचा शिवसेनेने सोमवारी पुनरुच्चार केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या ‘५०-५० फार्म्युल्या’बद्दल भाजपाने खरे सांगावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. रावते राज्यपाल कोश्यारी यांना भेटले. पण या भेटीत राजकीय असे काही नाही, असे राऊत म्हणाले. सत्तेत समान वाटा देण्यास भाजपाने नकार दिला तर काय होईल, असे विचारले असता राऊत म्हणाले,‘भाजपाने रामाच्या नावावर मते मागितली. आता तुम्ही (भाजपा) राममंदिरही बांधणार आहात. राम ‘सत्यवचनी’ होता. त्यामुळे भाजपाने आता यावर (५०-५० फॉर्म्युला) खरे बोलले पाहिजे. तुम्हाला कागद फाडता येईल; पण रेकॉर्ड (भाजपा-शिवसेनेत झालेला समान सत्ता वाटपाचा करार) डिलिट करता येणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDiwakar Raoteदिवाकर रावते