शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Raosaheb Danve on Shivsena: "शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", रावसाहेब दानवेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 16:46 IST

मुंबई महापालिका भाजपाच जिंकणार असल्याचाही विश्वास

Raosaheb Danve on Shivsena: शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर ४० आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उर्वरित शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच बंडखोरांवरही टीकास्त्र सोडताना दिसत आहे. तशातच शिवसेनेतील अनेक नगरसेवकापासून खासदारापर्यंत सर्व जण शिंदे गटाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच जण शिल्लक राहतील असा खोचक टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

"महाराष्ट्रात सरकार आल्याचा आनंद झाला. पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी ९२ पैकी ८२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे", अशा शब्दांत रावसाहेब दानवेंनी टोला लगावला.

"शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू. जी राहिली आहे, ती शिवसेना फुटू देऊ नका. येत्या निवडणुकांनंतर राज्याचं चित्र काय होतं बघा. मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव अशा सर्वच महत्त्वाच्या महापालिका आम्ही जिंकणार या आम्हाला विश्वास आहे", असेही दानवे म्हणाले.

दरम्यान, दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर, देवेंद्र फडणवीसांनी हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्रीपदाबाबात विचारले असता, मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवे