शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Maharashtra Political Crisis: “अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 22:08 IST

Maharashtra Political Crisis: कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे, यादृष्टीने भाजपचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, अनेक केंद्रीयमंत्री कामाला लागले आहेत. भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला. मात्र, आता पुढील लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू, असा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

गेल्यावेळी बारामतीचा  कार्यक्रम थोडक्यात हुकला, अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती आहे असे भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम शिंदे भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागील दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीस आल्या यावरून तुम्हाला कळाले असेलच की ही निवडणूक किती सीरियस लढणार आहे की नाही. काहींच्या  चेहऱ्याकडे बघितले की लगेच लक्षात येते, नाव घ्यावे लागत नाही, असा खोचक टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला.

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे. A म्हटले की अमेठी आणि B म्हटले की बारामती. A चा कार्यक्रम २०१९ ला केला. २०१९ ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो आता २०२४ ला करायचा आहे. त्याच्यासाठीच १७ महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन साधे नसून, या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते, असे राम शिंदे म्हणाले. 

दरम्यान, दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असे सूचक विधानही राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRam Shindeराम शिंदेBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक