शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

“सुप्रीम कोर्टाची ठाकरे सरकारला चपराक, आता ‘त्या’ १२ आमदारांचं निलंबन कधी रद्द करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:07 IST

१२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई: १२ आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच होत असल्याचे सांगून कोणत्याही आमदारांना ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी निलंबित करण्याचा सभागृहाचा अधिकार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून आता भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधत त्या १२ आमदारांचे निलंबन कधी रद्द करणार, अशी विचारणा केली आहे. 

भाजप आमदार राम कदम यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकारने राजकीय सूडापोटी आमच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केले. आता देशाची सर्वोच्च न्यायपालिकाच म्हणते की कोणत्याही आमदारांचे ५९ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी केलेले निलंबन हे निलंबन नसून ते बडतर्फ केल्यासारखे आहे. संविधानाने आखून दिलेल्या नियमांच्या विरोधात आहे. नियमांची पायमल्ली आहे, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

आता ‘त्या’ १२ आमदारांचं निलंबन कधी रद्द करणार?

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा सणसणीत चपराक दिली आहे. जर देशाची सर्वोच्च न्यायपालिका म्हणत असेल की हे चुकीचे असून संविधानाची पायमल्ली आहे, तर आपण या १२ आमदारांचे निलंबन कधी रद्द करणार आहात, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. 

दरम्यान, निलंबन ही त्या आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली शिक्षा आहे. आज १२ आहेत. उद्या १२० असतील. लोकशाहीमध्ये हा चुकीचा पायंडा पडू शकतो आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांसोबत तडजोड होण्याचा मोठा धोका आहे. आमदारांचे निलंबन केल्यामुळे संबंधित मतदारसंघाचे प्रश्न मांडले जात नाहीत. सभागृहाला ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार नाही. नियमानुसार कोणताही मतदारसंघ ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रतिनिधीत्वाशिवाय राहू शकत नाही. या प्रकरणापुरते बोलायचे झाल्यास आता पुरे झाले. आम्हाला अधिक तपशील देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRam Kadamराम कदमBJPभाजपा