शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही, खरे रुप समोर येतेय, पण...”; भाजपा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:31 IST

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही, असे सांगत भाजपा नेत्याने मनोज जरांगेंना सुनावले.

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळी वळणे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर, मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले होते. आता मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे यांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. मनोज जरांगे यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले बेताल विधान कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. तसे जीआर काढले. आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तुम्हाला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, आता तुमचे खरे रुप समोर येत आहे. समाजाच्या आडून तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे. मात्र, मराठा समाज एवढा भोळा नाही. तुमच्या कोणत्याही भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मनोज जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचतात, हे समोर येऊ लागले आहे. दगडफेकीची घटना झाली. ती दुर्दैवीच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच जाणता राजा तिथे जातात. लगेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जातात. उद्धव ठाकरे जातात. हे कशाचे द्योतक आहे. हे पूर्णपणे नियोजित आणि प्लानिंगने करण्यात आले होते, हे समोर येऊ लागले आहे. तुम्ही त्यात नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. एसआयटी अशासाठी नेमलेली आहे की, यांच्या स्क्रिप्ट कोण लिहिते, यांचे मोबाइल रेकोर्ड तपासावे लागतील. यामागे कोणी षडयंत्र रचले आहे. त्या रात्री मनोज जरांगे यांच्या घरी कोण गेले होते. त्यांना उपोषणाला आणून कोणी बसवले, ही सगळी चौकशी व्हायला पाहिजे. दूध का दूध-पानी का पानी व्हायला हवे, ही शासनाची भूमिका आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण