शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

“मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही, खरे रुप समोर येतेय, पण...”; भाजपा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:31 IST

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही, असे सांगत भाजपा नेत्याने मनोज जरांगेंना सुनावले.

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळी वळणे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर, मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले होते. आता मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे यांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. मनोज जरांगे यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले बेताल विधान कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. तसे जीआर काढले. आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तुम्हाला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, आता तुमचे खरे रुप समोर येत आहे. समाजाच्या आडून तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे. मात्र, मराठा समाज एवढा भोळा नाही. तुमच्या कोणत्याही भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मनोज जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचतात, हे समोर येऊ लागले आहे. दगडफेकीची घटना झाली. ती दुर्दैवीच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच जाणता राजा तिथे जातात. लगेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जातात. उद्धव ठाकरे जातात. हे कशाचे द्योतक आहे. हे पूर्णपणे नियोजित आणि प्लानिंगने करण्यात आले होते, हे समोर येऊ लागले आहे. तुम्ही त्यात नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. एसआयटी अशासाठी नेमलेली आहे की, यांच्या स्क्रिप्ट कोण लिहिते, यांचे मोबाइल रेकोर्ड तपासावे लागतील. यामागे कोणी षडयंत्र रचले आहे. त्या रात्री मनोज जरांगे यांच्या घरी कोण गेले होते. त्यांना उपोषणाला आणून कोणी बसवले, ही सगळी चौकशी व्हायला पाहिजे. दूध का दूध-पानी का पानी व्हायला हवे, ही शासनाची भूमिका आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण