शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही, खरे रुप समोर येतेय, पण...”; भाजपा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:31 IST

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही, असे सांगत भाजपा नेत्याने मनोज जरांगेंना सुनावले.

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळी वळणे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर, मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले होते. आता मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे यांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. मनोज जरांगे यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले बेताल विधान कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. तसे जीआर काढले. आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तुम्हाला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, आता तुमचे खरे रुप समोर येत आहे. समाजाच्या आडून तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे. मात्र, मराठा समाज एवढा भोळा नाही. तुमच्या कोणत्याही भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मनोज जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचतात, हे समोर येऊ लागले आहे. दगडफेकीची घटना झाली. ती दुर्दैवीच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच जाणता राजा तिथे जातात. लगेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जातात. उद्धव ठाकरे जातात. हे कशाचे द्योतक आहे. हे पूर्णपणे नियोजित आणि प्लानिंगने करण्यात आले होते, हे समोर येऊ लागले आहे. तुम्ही त्यात नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. एसआयटी अशासाठी नेमलेली आहे की, यांच्या स्क्रिप्ट कोण लिहिते, यांचे मोबाइल रेकोर्ड तपासावे लागतील. यामागे कोणी षडयंत्र रचले आहे. त्या रात्री मनोज जरांगे यांच्या घरी कोण गेले होते. त्यांना उपोषणाला आणून कोणी बसवले, ही सगळी चौकशी व्हायला पाहिजे. दूध का दूध-पानी का पानी व्हायला हवे, ही शासनाची भूमिका आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण