शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:52 IST

Radhakrishna Vikhe Patil News: राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.

Radhakrishna Vikhe Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर विरोधकांनी दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय बोलून दाखवला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला इतके दिवस होऊन गेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना संशय व्यक्त केला. 

राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. वरळीत मनसैनिकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले की, विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

गेल्या सात निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत आलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत कसे झाले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही.

दरम्यान, तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जात आहे. असे काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRaj Thackerayराज ठाकरे