शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:52 IST

Radhakrishna Vikhe Patil News: राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.

Radhakrishna Vikhe Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर विरोधकांनी दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय बोलून दाखवला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला इतके दिवस होऊन गेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना संशय व्यक्त केला. 

राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. वरळीत मनसैनिकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले की, विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

गेल्या सात निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत आलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत कसे झाले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही.

दरम्यान, तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जात आहे. असे काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRaj Thackerayराज ठाकरे