शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:52 IST

Radhakrishna Vikhe Patil News: राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.

Radhakrishna Vikhe Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर विरोधकांनी दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय बोलून दाखवला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला इतके दिवस होऊन गेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना संशय व्यक्त केला. 

राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. वरळीत मनसैनिकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले की, विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

गेल्या सात निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत आलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत कसे झाले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही.

दरम्यान, तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जात आहे. असे काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRaj Thackerayराज ठाकरे