शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:52 IST

Radhakrishna Vikhe Patil News: राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.

Radhakrishna Vikhe Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर विरोधकांनी दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय बोलून दाखवला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला इतके दिवस होऊन गेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना संशय व्यक्त केला. 

राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. वरळीत मनसैनिकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले की, विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

गेल्या सात निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत आलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत कसे झाले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही.

दरम्यान, तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जात आहे. असे काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRaj Thackerayराज ठाकरे