शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यातच अडकून ठेवण्याची भाजपची खेळी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:55 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील गच्छंती झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागली. नवनिर्वाचित थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना जिल्ह्यातूनच कडवे आव्हान मिळणार, अशी शक्यता आहे. एकूणच थोरातांना जिल्ह्यात अडकून ठेवण्याची योजना तर भाजपने आखली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी विरोधीपक्षनेते आणि आता भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची जणूकाही जबाबदारीच घेतली आहे. मुलाला भाजपमधून खासदार केल्यानंतर विखे पाटील देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात २०० तर अहमदनगरमधून १२-० अशी युतीची स्थिती राहिल असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या थोरात यांच्यासमोर अहमदनगरमध्येही चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे.

सध्या तरी भाजपनेते विखे पाटील काँग्रेसमधील नाराज आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यासाठी दुवा ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

नगरमध्ये सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. सहाजिकच पक्षांतर करून आल्यानंतर लगेच मंत्रीपद मिळविणाऱ्या विखे पाटलांवर नगरमध्ये युतीचं संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगरचेच असल्यामुळे विखेंसाठी पक्षाकडून मिळालेले टार्गेट तितकेसे सोपे नाही, हे देखील तेवढंच खरं.