शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:43 IST

ल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावरून उदयनराजे लवकरच भाजपवासी होणार असंच दिसत आहे.

मुंबई - भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी करणाऱ्या नेत्यांमध्ये साताऱ्याचे डॅशिंग खासदार छत्रपती उदयनराजे यांचं नावही सामील होण्याची शक्यता आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर उदयनराजे यांनी देखील लवकरच निर्णय घेईल, असा सूचक इशारा दिला आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरानंतर उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावरून उदयनराजे लवकरच भाजपवासी होणार असंच दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी भाजपवर अनेकदा टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष्य केले होते. परंतु, आता तेच उदयनराजे भाजपचे गोडवे गात असल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक समर्थकांना उदयनराजे यांनी धरलेली भाजपची वाट रुचलेली नाही. उदयनराजे यांच्या फेसबुक पेजवरच अनेक समर्थक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

उदयनराजे यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. त्यांच्या फोटवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. परंतु, सध्या त्यांच्या पेजवर टाकलेल्या पोस्टवर देखील राजे आपण भाजपमध्ये जावू नका, अशी विनवणी करण्यात येत आहे. त्यांच्या एका पोस्टवर सर्वाधिक कमेंट भाजपात जावू नका अशाच आहेत. तर बोटावर मोजण्याईतपत समर्थक राजेंच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने उदयनराजे यांचा पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. शिवसेनेकडून उदयनराजे यांच्याविरोधात नरेंद्र पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परंतु, उदयनराजे यांनी अपेक्षेप्रमाणे शानदार विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आले होते. परंतु, आता उदयनराजेच भाजपच्या वाटेवर असल्यामुळे राष्ट्रवादीची लोकसभेची आणखी एक जागा कमी होण्याची शक्यता दिसत आहे.