शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:18 IST

हिंदुत्वात ठाकरे वाटेकरी नकोत, एकत्र आल्यास रणनीती फसेल 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून होत असले तरी शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसेल, असे म्हटले जात आहे.

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांना भाजपने सोबत घेतले व सरकार स्थापन करताना शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप अशी युती करून २०२४ लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकाव्यात, अशी रणनीती भाजपने आखली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेवरील एकछत्री अमलाला शह देणे आणि भाजपशी चांगला समन्वय राखून पुढे जाण्याच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सोबत घेणे हा भाजपचा दुहेरी उद्देश आहे. मात्र, उद्या ठाकरे-शिंदे एकत्र आले तर भाजपची सगळीच रणनीती फसणार आहे. त्यामुळेच भाजपला ठाकरे-शिंदे एकत्र येणे मान्य नसेल, असे मानले जाते. 

हिंदुत्वामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वाटा भाजपला नको आहे. ठाकरे यांनी गेली काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व एकूणच भाजपवर सडकून टीका केली व अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका सुरू केली. शिवसेना केवळ महाराष्ट्रात असली तरी त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळते. त्यामुळे एकदाचा ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याची रणनीती भाजपने आखली व शिंदे यांच्या नेतृत्वात बंड घडवून आणले. त्यामुळे आता ठाकरे-शिंदे एकत्र येणे भाजपच्या संपूर्ण खेळीला तडा देणारे असेल. त्यामुळे भाजप ते होऊ देणार नाही, असे म्हटले जात आहे.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले, की ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील असे आम्हाला वाटत नाही. तसे होणार असेल तर एकूणच सर्व गोष्टींचा फेरविचार आम्हाला करावा लागेल. एक निश्चित अशी भूमिका घेऊन शिंदे हे आमच्यासोबत आले आहेत आणि ते परत वेगळा निर्णय घेतील असे आम्हाला वाटत नाही.

एकत्र येण्यासाठी अजूनही आहे वावउद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि शिंदे यांना सन्मानाने बोलावून सोबत घ्यावे. शिंदे हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतच सर्व ५४ आमदार, १८ खासदार काम करतील, असा मार्ग काढण्याचा प्रयत्न शिवसेनेतील दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून सध्या होत आहे. ठाकरे व त्यांच्या परिवाराविरुद्ध आम्ही कोणतीही वैयक्तिक टीका करणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. 

एकनाथ शिंदे यांना अजूनही सन्मानाने बोलवा, चर्चा करा व तोडगा काढा, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते  दीपक केसरकर यांनी मांडली आहे. जे सोडून गेले ते परत आले तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असतील, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे-शिंदे एकत्र येण्याला अजूनही वाव असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे