शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपाही आता गांधीजींच्या मार्गाने; २ ते १५ आॅक्टोबर राज्यभर पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:21 IST

भारतीय जनता पार्टीही महात्मा गांधींच्या मार्गाने निघाली असून २ आॅक्टोबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची स्वच्छता, सेवा व संवाद पदयात्रा काढणार आहे.

- यदु जोशीमुंबई : भारतीय जनता पार्टीही महात्मा गांधींच्या मार्गाने निघाली असून २ आॅक्टोबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची स्वच्छता, सेवा व संवाद पदयात्रा काढणार आहे.भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू झाली. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.२ आॅक्टोबरपासूनच्या यात्रेत स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल. एका पदयात्रेत प्रत्येकी ७५ पुरुष-महिला कार्यकर्ते,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील. १५ टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात बिरसा मुंडा जनजातीय अभियान राबविले जाईल. तर भाजपाच्या पेजप्रमुखांची संमेलने १ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान होणार आहेत.खेलो महाराष्ट्र मुख्यमंत्री चषक२८ सप्टेंबर ते १२ जानेवारी दरम्यान भाजपा युवा मोर्चातर्फे खेलो महाराष्ट्र उपक्रम राबविला जाईल. तालुका ते राज्य पातळीपर्यंत क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांचे सामने होतील. आयुष्यमान क्रिकेट, जलशिवार फुटबॉल अशी स्पर्धाची नावे असतील. अंतिम स्पर्धेला मुख्यमंत्री चषक असे नाव राहील.आणखी १ लाखसदस्य जोडणारराज्यात भाजपाचे १ कोटी ५ लाख सदस्यसंख्या असताना आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणखी एक लाख सदस्य नोंदणी करून एकूण सदस्य संख्या दीड कोटींवर नेली जाणार आहे.भाजपाची पावले स्वबळाकडेशिवसेनेशी युतीस आम्ही तयार असल्याचे भाजपाकडून सांगितले जात असले तरी त्याचवेळी भाजपाने स्वबळाची तयारीही सुरू केली आहे.गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षात पदयात्रा काढून संवाद साधण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. गांधीजी हे राष्ट्रपिता आहेत आणि ते सगळ्यांचे आहेत. ते काही एकट्या काँग्रेसची प्रॉपर्टी नाहीत.- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाnewsबातम्या