शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवारांनी माघार घेतली, मी सर्वांना पुरून उरणारा; खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 17:06 IST

खा रणजितसिंह यांच्या मागणीनुसार फलटणला तातडीने पासपोर्ट कार्यालय सुरू करणार, केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचं आश्वासन

फलटण- सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार मला व आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून तोही या सर्वांना पुरून उरणारा आहे असा इशारा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. शायनिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनीही हजेरी लावली होती.    

माढा लोकसभा मतदारसंघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. याची दखल घेत तातडीने फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय दूर संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा समावेश असणाऱ्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप आणि भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमधील आदर्श खासदारांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात व त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा, यासाठी शाइनिंग महाराष्ट्र हे महा प्रदर्शन त्यांनी आयोजित करून चांगला पायंडा पाडला आहे.  या  महाप्रदर्शनामुळे केंद्रीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळलेली आहे व आगामी काळामध्ये सुद्धा अशाच विविध योजनांच्या द्वारे केंद्र सरकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो.जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही आगामी काळामध्ये मुंबईवरून हैदराबादकडे जाणारी बुलेट ट्रेन फलटण व अकलुज मार्गे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच माढा लोकसभा मतदार संघ विकासात आघाडीवर असेल असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले. प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले तर आभार अनुप शहा यांनी मानले.

...म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा शरद पवार व विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तर खा शरद पवार पूर्वी निवडून गेले होते. परंतु भाजपच्या उमेदवारापुढे आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी ही माघार घेतली होती. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्या विरोधात खेळलेल्या षडयंत्रामध्ये कधीही हारलो नाही त्यामुळे कोणत्याही आंडुपांडूच्यासमोर सुद्धा आपण हरणार नाही असा इशारा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  केले. 

या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, मी भेटल्यावर जिहे कठापुर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 700 कोटी निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे. सातशे कोटी निधी म्हणजे नक्की सातशे वर किती शून्य हे रामराजेंना विचारा असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला

 

टॅग्स :Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरSharad Pawarशरद पवार