शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:13 IST

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता करताना झालेल्या एका मोठ्या सभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आणि राज्यसभेत खासदार झालेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे राहुल गांधींचा रोख होता असे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

याच प्रदेशचे वरिष्ठ नेता काँग्रेस सोडतात आणि रडून माझ्या आईला सांगतात की, सोनियाजी मुझे शर्म आ रही हैं, मेरे में इस शक्ती से लढने की हिंमत नाही हैं. में जेल नहीं जाना चाहता हूं...' हे एक नाही, अशा हजारो लोकांना घाबरविले आहे आणि ते सोडून गेले आहेत. अशा शब्दांत राहुल गांधींनी काही नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले नाहीत, शक्त्तीने त्यांचा गळा पकडून भाजपाकडे नेले आहे, ते सगळे घाबरून गेले आहेत, असे सांगत राहुल गांधींनी टीका केली होती. याबाबत अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण, राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल, तर ते हास्यास्पद आहे. तथ्यहीन आहे. मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही. सोनिया गांधी यांना भेटून माझ्या भावना व्यक्त केल्यासंदर्भात जे विधान करण्यात आले आहे, ते चुकीचे आहे. दिशाभूल करणारे आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस सोडेपर्यंत पक्षाचे काम करत राहिलो आहे. त्यामुळे काँग्रेस सोडणार असल्याबाबतची माहिती कुणालाही नव्हती, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते, त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे. लोक विचार करतात की, आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मी एकटा चाललो नाही, देशातील सगळे विरोधी पक्ष व लोक माझ्याबरोबर चालले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिला, युवांच्या प्रश्न, अग्नीवीरांचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा होती. हा देश एकमेकांचा तिरस्कार करणारा नव्हे, तर एकमेकांवर प्रेम करणारा आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा