शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:13 IST

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता करताना झालेल्या एका मोठ्या सभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आणि राज्यसभेत खासदार झालेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे राहुल गांधींचा रोख होता असे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

याच प्रदेशचे वरिष्ठ नेता काँग्रेस सोडतात आणि रडून माझ्या आईला सांगतात की, सोनियाजी मुझे शर्म आ रही हैं, मेरे में इस शक्ती से लढने की हिंमत नाही हैं. में जेल नहीं जाना चाहता हूं...' हे एक नाही, अशा हजारो लोकांना घाबरविले आहे आणि ते सोडून गेले आहेत. अशा शब्दांत राहुल गांधींनी काही नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले नाहीत, शक्त्तीने त्यांचा गळा पकडून भाजपाकडे नेले आहे, ते सगळे घाबरून गेले आहेत, असे सांगत राहुल गांधींनी टीका केली होती. याबाबत अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण, राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल, तर ते हास्यास्पद आहे. तथ्यहीन आहे. मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही. सोनिया गांधी यांना भेटून माझ्या भावना व्यक्त केल्यासंदर्भात जे विधान करण्यात आले आहे, ते चुकीचे आहे. दिशाभूल करणारे आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस सोडेपर्यंत पक्षाचे काम करत राहिलो आहे. त्यामुळे काँग्रेस सोडणार असल्याबाबतची माहिती कुणालाही नव्हती, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते, त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे. लोक विचार करतात की, आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मी एकटा चाललो नाही, देशातील सगळे विरोधी पक्ष व लोक माझ्याबरोबर चालले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिला, युवांच्या प्रश्न, अग्नीवीरांचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा होती. हा देश एकमेकांचा तिरस्कार करणारा नव्हे, तर एकमेकांवर प्रेम करणारा आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा