शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती अन् बेडकाच्या गोष्टीवर आजही ठाम?; खासदार अनिल बोंडेंनी केली सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:17 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प रेंगाळले होते हे सर्व मार्गी लागतात. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे असं अनिल बोंडे म्हणाले.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याहून अधिक पसंती मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना आहे अशाप्रकारे जाहिरात सर्वच वृत्तपत्रात आली त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेला खडेबोल सुनावले. त्यात भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. 

बेडूक आणि हत्ती यावरून पत्रकारांनी आज अनिल बोंडे यांना प्रश्न विचारताच त्यांनी सारवासारव करत म्हणाले की, एखाद्या जाहिरातीनं मैत्रीत आणि एकीत बाधा येणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने प्रकल्प राबवले जात आहेत. महाराष्ट्राला शिंदे-फडणवीस सरकारची गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प रेंगाळले होते हे सर्व मार्गी लागतात. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे. मी भाजपाचा साधा कार्यकर्ता आहे. मलाही भावना आहेत. भावना व्यक्त करणे हे वाईट नसते. परंतु भावनेपेक्षाही काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. संजय राऊतांनी फेविकॉलच्या जोडमध्ये नाक खुपसू नये आता जाहिरातीचा वाद संपला आहे असं त्यांनी म्हटलं.  

तसेच २०१९ ला जनतेने शिवसेना-भाजपाला मत देऊन सरकारमध्ये बसण्याची संधी दिली. परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. महाभकास आघाडी निर्माण केली आणि अडीच वर्ष राज्य केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारी शिवसेना पुन्हा भाजपासोबत आली. आता या सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लागत आहेत असं अनिल बोंडे यांनी सांगितले. 

त्याचसोबत काँग्रेसला औरंगजेब, टीपू सुल्तान चालतो. परंतु ज्यांनी राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे हेगडेवार, गोळवलकर गुरुजी आणि देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले ते काँग्रेसला चालत नाही. महाराणा प्रतापही काँग्रेसला चालणार नाही. १९४७ काळापासून लोकांमध्ये गुलामीची मानसिकता लादण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता तोच आता कर्नाटकात सुरू झाला आहे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकातून आरएसएसचा इतिहास वगळला त्यावर दिली. 

काय म्हणाले होते अनिल बोंडे?

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागला आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला होता. 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस