शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 22:27 IST

भाजपा आमदार सुरेश धस बरळले 

औरंगाबाद: भारतीय हवाई दलातील विरप्पनसारखा अभिनंदन वर्धमान पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अवघ्या 60 तासात मायदेशी परतला, अशी मुक्ताफळं भाजपा आमदार सुरेश धस यांनी उधळली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचं आणि खंबीर नेतृत्त्वाचं लक्षण असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केलं. यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचं सांगत धस यांनी सारवासारव केली. 14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. 26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राइक केल्यावर 27 तारखेला पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलानं उधळून लावला. त्यावेळी आकाशात दोन्ही हवाई दलांच्या विमानांची चकमक झाली. त्यावेळी मिग-21 मधील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान पाडलं. मात्र त्यानंतर अभिनंदन यांचं विमान कोसळलं. त्याआधी त्यांनी स्वत:ची विमानातून सुटका केली. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांच्य हाती लागले. जवळपास 60 तास ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. 1 मार्चला ते वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले. धस यांच्याआधी प्रदेशाध्यक्ष दानवे बरळलेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 5 एप्रिलला पुलवामा हल्ल्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगरमध्ये रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुलवामात आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचं म्हटलं. रावसाहेब दानवेंनी जवानांना दहशतवादी संबोधलं. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला गेला. विशेष म्हणजे दानवेंनी दुसऱ्यांदा ही चूक केली. मार्चमध्येही दानवेंनी जवानांबद्दल बोलताना अतिरेकी शब्द वापरला होता. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानSuresh Dhasसुरेश धसindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे