शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:46 IST

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला

BJP Prasad Lad, Love Jihad Issue: गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात लव्ह जिहाद हा मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही चित्रपटही आले आहेत. त्यावरून अपेक्षित वाद झालाच. पण आता उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करावा, मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, त्याचप्रमाणे लँड जिहाद सारख्या विषयांचा देखील गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या 260 च्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार लाड यांनी ही मागणी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. परंतु उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करावा, असे मत लाड यांनी सभागृहात व्यक्त केले. राज्यातील लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणात कशाप्रकारे हिंदू मुलींना फूस लावली जात आहे. लँड जिहादची प्रकरणे घडत आहेत, याबाबत सभागृहात त्यांनी माहिती दिली.

सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. आणि या नुसारच मागील एका वर्षाच्या काळात महाराष्ट्र सरकार काम करत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लाड यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देताना सांगितले की, मागील 3 वर्षात देशातून 13 लाख पेक्षा अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावातील अल्पवयीन मुलींच्या फसवणूक प्रकरणाचा उल्लेख देखील लाड यांनी यावेळी सभागृहात केला. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात टेरर फंडींग होत असून, उंबरे गावातील प्रकरणाची एक सीडी सभापतींना देणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी दिली.

मागील वर्षभरात काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोशाला न्याय मिळावा तसेच हिंदू, बौद्ध, शीख, सिंधी मुलींना लवकर न्याय मिळेल, यासाठी लव्ह जिहादसारख्या कायद्यांची नितांत गरज आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणुकीतून विवाह आणि त्या काळात होणारे धर्मांतरण हा विषय गांभीर्याचा आहे. विविध मोर्च्याच्या माध्यमातून जनतेच्या भावना पुढे आलेल्या आहेत. केरळसारख्या राज्यात देखील या विषयाला गांभीर्याने घेतले आहे. १४ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींना फसवून असे प्रकार घडत आहेत. अशा प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय देखील आहे, असे स्पष्ट मत यावेळी आमदार लाड यांनी मांडले.

मुंबईसारख्या शहरांमध्ये जिकडे झोपडपट्टीचा भाग आहे. धारावी, मालवणीसारख्या झोपडपट्टी भागात हे प्रकार घडत आहेत. तेथील मुलींना आमिष दाखवून फसवल जात आहे आणि लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून, हिंदू समाजातील मुलींवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे. इतर राज्यांनी केलेल्या कायद्यांची माहिती मागवली जावी आणि आपल्या राज्यात अशा प्रकारचा कडक कायदा केला पाहिजे व त्यात योग्य त्या तरतुदी केल्या पाहिजेत. उत्तरप्रदेशच्या कायद्याचा अभ्यास करून, मग त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. येत्या काळात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा व्हावा, ही जनतेची सुद्धा तीव्र इच्छा असल्याच्या भावना आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.

त्याचप्रमाणे मशिदीवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ध्वनीक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विषय देखील आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केला. राज्यात सातत्याने मागणी झाली की मशिदीवरचे भोंगे काढले जावेत, सुप्रीम कोर्टाचे देखील याबाबत निर्देश आहेत. याबाबत राज्य सरकारकडे कुठलीही नियमावली नसून, सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. व याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

समोर भोंगे लागले आणि आम्ही हनुमान चालिसा म्हणालो तर त्यावर विषय वाढवला जातो, असे स्पष्ट मत आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेते, हे पहावे लागेल.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Love Jihadलव्ह जिहादPrasad Ladप्रसाद लाड