शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:09 IST

मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला.

मुंबई - उद्धव ठाकरेंची मुलाखत ऐकून मनात दु:ख झाले. माझे वडील आहेत. माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. उद्धव ठाकरेंना अजून कळलं नाही. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र असंख्य लोकांचे दैवत आहेत आणि आपल्याच वडिलांना अजून किती लहान करणार हे न कळल्यामुळे उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले आहेत असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचे फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका. मग त्या त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का? हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही. बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्मारक का बांधताय? ज्योत का पेटवली आहे? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते. शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच तुम्ही गुंगीत होता, उभं राहता येत नव्हतं मग डावोसमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई काय ढिंगाणा घालत होता ते विचारा. तुमच्या मुलाला प्रश्न विचारू शकत नाही मग अन्य लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? राज्यातील आमदारांना पालापाचोळा बोलून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकांमधून निवडून आले आहेत. राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्र आमच्या बापाची जहागिर आहे अशा आवेशात अडीच वर्ष कारभार केला असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत. मुंबईशी गद्दारी कोणी केली? साडेसातनंतर दिनू मोरियाच्या घरी उद्धव ठाकरेंचे पुत्र कोरोना काळात ढिंगाणा घालायचे तेव्हा तुम्हाला मुंबई आठवली नाही का? महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी कार्डवर पाटणकर नाव चढवायचं आहे. हे पण माझं, ते पण माझं हेच अडीच वर्षात अजून काय केले? मुंबई कुणी तोडणार नाही. मुंबईला विकणारे हे लोक आहेत असा घणाघात नितेश राणेंनी केला. 

वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा काढावरुण सरदेसाईमुळे युवासेनेची वाट लागली. हे संपवण्याचं काम वरूण सरदेसाईने केले. युवासेना विकायला काढायची. मुंबई महापालिका, मुख्यमंत्री कार्यालयाच्या बैठकीत वरूण सरदेसाईंना का बसवलं गेले? सरकारी सुरक्षा का पुरवली जातेय? वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा सरकारने काढावी अशी मागणी नितेश राणेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे