शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:09 IST

मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला.

मुंबई - उद्धव ठाकरेंची मुलाखत ऐकून मनात दु:ख झाले. माझे वडील आहेत. माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. उद्धव ठाकरेंना अजून कळलं नाही. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र असंख्य लोकांचे दैवत आहेत आणि आपल्याच वडिलांना अजून किती लहान करणार हे न कळल्यामुळे उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले आहेत असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचे फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका. मग त्या त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का? हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही. बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्मारक का बांधताय? ज्योत का पेटवली आहे? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते. शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच तुम्ही गुंगीत होता, उभं राहता येत नव्हतं मग डावोसमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई काय ढिंगाणा घालत होता ते विचारा. तुमच्या मुलाला प्रश्न विचारू शकत नाही मग अन्य लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? राज्यातील आमदारांना पालापाचोळा बोलून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकांमधून निवडून आले आहेत. राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्र आमच्या बापाची जहागिर आहे अशा आवेशात अडीच वर्ष कारभार केला असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत. मुंबईशी गद्दारी कोणी केली? साडेसातनंतर दिनू मोरियाच्या घरी उद्धव ठाकरेंचे पुत्र कोरोना काळात ढिंगाणा घालायचे तेव्हा तुम्हाला मुंबई आठवली नाही का? महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी कार्डवर पाटणकर नाव चढवायचं आहे. हे पण माझं, ते पण माझं हेच अडीच वर्षात अजून काय केले? मुंबई कुणी तोडणार नाही. मुंबईला विकणारे हे लोक आहेत असा घणाघात नितेश राणेंनी केला. 

वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा काढावरुण सरदेसाईमुळे युवासेनेची वाट लागली. हे संपवण्याचं काम वरूण सरदेसाईने केले. युवासेना विकायला काढायची. मुंबई महापालिका, मुख्यमंत्री कार्यालयाच्या बैठकीत वरूण सरदेसाईंना का बसवलं गेले? सरकारी सुरक्षा का पुरवली जातेय? वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा सरकारने काढावी अशी मागणी नितेश राणेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे