शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Maharashtra Politics: “शरद पवार कधीही विश्वासाने वागले नाहीत, उद्धव ठाकरेंचाही ‘ओक्के कार्यक्रम’...”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:22 IST

Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटही या टीकेचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे. यातच भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना, शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, असा मोठा आरोप केला आहे. 

शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळे पोलीस खाते चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळले नाही, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. 

बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते

राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते. सरकारच्या बाहेर बसणे पसंत केले असते. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केले. शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासाने केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले, या शब्दांत जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, सत्ता आली तर उतू नका, मातू नका. आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचे सोने करा आणि लोकांची मनापासून सेवा करा, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे