शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शरद पवार कधीही विश्वासाने वागले नाहीत, उद्धव ठाकरेंचाही ‘ओक्के कार्यक्रम’...”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:22 IST

Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटही या टीकेचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे. यातच भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना, शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, असा मोठा आरोप केला आहे. 

शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळे पोलीस खाते चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळले नाही, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. 

बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते

राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते. सरकारच्या बाहेर बसणे पसंत केले असते. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केले. शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासाने केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले, या शब्दांत जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, सत्ता आली तर उतू नका, मातू नका. आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचे सोने करा आणि लोकांची मनापासून सेवा करा, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे