शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शरद पवार कधीही विश्वासाने वागले नाहीत, उद्धव ठाकरेंचाही ‘ओक्के कार्यक्रम’...”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:22 IST

Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटही या टीकेचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे. यातच भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना, शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, असा मोठा आरोप केला आहे. 

शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळे पोलीस खाते चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळले नाही, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. 

बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते

राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते. सरकारच्या बाहेर बसणे पसंत केले असते. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केले. शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासाने केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले, या शब्दांत जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, सत्ता आली तर उतू नका, मातू नका. आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचे सोने करा आणि लोकांची मनापासून सेवा करा, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे