शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार म्हणाले, “रामाची नियतच खराब होती, पण...”; शिवसेनेनं पाठवली ‘रामायण’ ग्रथांची प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:50 IST

सातारच्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभू रामचंद्राबाबत केलेल्या विधानावरुन गोत्यात अडकले आहेत.

ठळक मुद्देजयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाची गोची झाली आणि शिवसेनेला चांगलाच मुद्दा सापडला आहे.भाजपच्या सर्व आमदारांना रामायण ग्रथांचे पठण करण्याची गरज " मी असतो तर " ब्रँडेड कोकणचे खासदार आता गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का ?

सातारा – एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन बोलताना किती भान सांभाळून बोललं पाहिजे याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव असं विधान केले. ते सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नारायण राणेंनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. आता भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचीही अशीच एक व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे.

सातारच्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभू रामचंद्राबाबत केलेल्या विधानावरुन गोत्यात अडकले आहेत. जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाची गोची झाली आणि शिवसेनेला चांगलाच मुद्दा सापडला आहे. वडूजच्या सातेवाडी येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले की, रामायणात लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो.

यानंतर आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती असं विधान त्यांनी दोनदा म्हटलं. त्यावर उपस्थितांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती अशी दुरुस्ती केली. जयकुमार गोरे यांनी अनावधानाने ही चूक केली असली तरी सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. अनेकजण या विधानाची खिल्ली उडवत आहेत.

शिवसेनेने पाठवली रामायण ग्रंथाची प्रत  

भगवान प्रभू रामचंद्रांचा भर सभेत अपमान करणारे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा शिवसेना पक्षाने जाहीर निषेध केला असून भाजपच्या सर्व आमदारांना रामायण ग्रथांचे पठण करण्याची गरज असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. रामायण - महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्याची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही डॉ मनीषा कायंदे यांनी दिला आहे.

प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. ऐकिव माहितीवर आपले चुकीचे ज्ञान देऊन महापुरुषांचा अपमान करू नये. " मी असतो तर " ब्रँडेड कोकणचे खासदार आता गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का ? असा सवालही डॉ मनीषा कायंदे यांनी केला आहे. प्रभू श्रीराम -रावण बिभीषण हे रामायणात होते का महाभारतात हे माहित नसलेले  भाजपचे  आमदार जयकुमार गोरे यांना मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे  रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना