शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 18:41 IST

Maharashtra News: महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. भाजप, शिंदे गट आणि मनसे या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. 

ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचे स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावे. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये, या शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सु्द्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला नव्हतं. महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो, असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे,  उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठीचे योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे. 

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत घेतलेल्या सहभागावरून टीकास्त्र सोडले आहे. सर्वांत दुर्देवाची बाब ही आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही कधी सावरकरांचा अपमान सहन केला नाही. त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सावरकारांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेत आहेत. ही कशी विचारसरणी आहे, असा सवाल करत, भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, या शब्दांत राम कदम यांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस