शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

NRC आणि CAA कायद्याविरोधात भाजपात नाराजीचा सूर; मुस्लिम कार्यकर्ते करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:20 IST

केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारे आणि संविधानाचे उल्लंघन करणारे आहे.

ठळक मुद्देसरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणाराया कायद्यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईलअन्यथा भाजपा अल्पसंख्याकचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात हिंसक आंदोलनाने पेट घेतला असताना सत्तेत असणाऱ्या भाजपामध्येच नाराजीचा सूर उमटत असल्याचं पुढे येत आहे. सांगली येथे भाजपा अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने आणलेल्या एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर विरोध करण्याचा ठराव मांडण्यात आला. 

सांगली भाजपा अल्पसंख्याक युवा जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेऊन समाधानकारक उत्तर मिळावे अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना भाजपाचे कार्यकर्ते अशरफ वांकर म्हणाले की, सध्या देशात भारतीय मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानिमित्ताने काहीजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे. एनआरसी आणि सीएए कायदाविरोधात आमची भूमिका आहे. या कायद्याविरोधात भाजपा अल्पसंख्याक कार्यकर्त्यामध्ये केंद्र सरकारवर नाराजीचा सूर उमटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या कायद्यात स्पष्टता आणावी. भारतीय मुस्लिमांवर या कायद्याचा परिणाम होणार नाही हे कसं ते स्पष्ट करावं. या दोन्ही विधेयकावरुन जे राजकारण देशात तापलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देणार आहोत. यानंतर आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

तर केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारा आणि संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने या कायदा रद्द करावा. तसेच याबाबत सरकारने समाधानकारक बदल न केल्यास भाजपा अल्पसंख्याक विभागाचे मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असा इशारा भाजपा अल्पसंख्याक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायद्यावर प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. पण हा कायदा संविधानानुसार लागू करता होऊ शकतो की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय 22 जानेवारीला सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), काँग्रेस नेते जयराम रमेश आणि अन्य याचिकांवर 22 जानेवारी 2020 रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीसही पाठवली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शहा