शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

NRC आणि CAA कायद्याविरोधात भाजपात नाराजीचा सूर; मुस्लिम कार्यकर्ते करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:20 IST

केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारे आणि संविधानाचे उल्लंघन करणारे आहे.

ठळक मुद्देसरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणाराया कायद्यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईलअन्यथा भाजपा अल्पसंख्याकचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात हिंसक आंदोलनाने पेट घेतला असताना सत्तेत असणाऱ्या भाजपामध्येच नाराजीचा सूर उमटत असल्याचं पुढे येत आहे. सांगली येथे भाजपा अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने आणलेल्या एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर विरोध करण्याचा ठराव मांडण्यात आला. 

सांगली भाजपा अल्पसंख्याक युवा जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेऊन समाधानकारक उत्तर मिळावे अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना भाजपाचे कार्यकर्ते अशरफ वांकर म्हणाले की, सध्या देशात भारतीय मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानिमित्ताने काहीजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे. एनआरसी आणि सीएए कायदाविरोधात आमची भूमिका आहे. या कायद्याविरोधात भाजपा अल्पसंख्याक कार्यकर्त्यामध्ये केंद्र सरकारवर नाराजीचा सूर उमटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या कायद्यात स्पष्टता आणावी. भारतीय मुस्लिमांवर या कायद्याचा परिणाम होणार नाही हे कसं ते स्पष्ट करावं. या दोन्ही विधेयकावरुन जे राजकारण देशात तापलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देणार आहोत. यानंतर आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

तर केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारा आणि संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने या कायदा रद्द करावा. तसेच याबाबत सरकारने समाधानकारक बदल न केल्यास भाजपा अल्पसंख्याक विभागाचे मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असा इशारा भाजपा अल्पसंख्याक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायद्यावर प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. पण हा कायदा संविधानानुसार लागू करता होऊ शकतो की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय 22 जानेवारीला सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), काँग्रेस नेते जयराम रमेश आणि अन्य याचिकांवर 22 जानेवारी 2020 रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीसही पाठवली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शहा