शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शिवसेनेकडून आता भाजपा मंत्रीही लक्ष्य

By admin | Updated: February 9, 2017 01:30 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता शिवसेनेने भाजपाच्या आजीमाजी मंत्र्यांकडे मोर्चा वळवून त्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिका काढली आहे.शिवसेनेच्या कार्यालयातून देण्यात येत असलेल्या ‘घोटाळेबाज भाजपा’ या पुस्तिेकत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट,अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे फोटो मुखपृष्ठावर छापून त्यांची नावे कोणत्या गैरव्यवहारात आहेत याचा उल्लेख केला आहे. आतील पानावर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्य मंत्री डॉ.रणजित पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार प्रवीण दरेकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे फोटो आतील पानांत गैरव्यवहारांच्या उल्लेखांसह दिलेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाव चिक्की घोटाळ्यात आले होते. त्याचा केवळ एका ओळीत उल्लेख केला आहे. ‘आमच्या लोकांना पैसे कसे खायचे हेच कळत नाही’ हे पंकजा यांचे वादग्रस्त विधान तेवढे नमूद केले आहे. प्रमोद महाजन हे माहिती प्रसारण मंत्री असतानाच्या काळात रिलायन्सच्या सोबतीने घोटाळा झाला होता याची आठवण मात्र करून देण्यात आली आहे. या शिवाय, केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नावाचा पुण्यातील एका जमीन घोटाळ्याप्रकरणी उल्लेख आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान आज पत्रकारांना प्रचारसाहित्याची किट देण्यात आली, त्यात ‘घोटाळेबाज भाजपा’ ही पुस्तिकाही होती. तथापि, त्यावर प्रकाशकाचे नाव नाही. याबाबत पक्षाच्या जनसंपर्क प्रमुखांकडे विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट केले की, ही पुस्तिका शिवसेनेने छापलेली नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव ती देण्यात आली आहे.मोदी सरकारचे घोटाळेकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे घोटाळेमुक्त असल्याचा दावा भाजपा करीत आली आहे. त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र, केंद्रातील घोटाळ्यांची जंत्री या पुस्तिकेत सादर केली आहे. त्यात छत्तीसगडमधील ३६ हजार कोटींचा तांदूळ घोटाळा, मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा, राजस्थानमधील खाण गैरव्यवहार, ललित गेट घोटाळा, स्पेक्ट्रम लिलावात झालेले देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान या विषयांवरून केंद्र सरकार आणि भाजपाप्रणित राज्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. नाशिक, पुण्यातील गुंडांना भाजपात दिलेला प्रवेश, आ. आशिष शेलार यांच्यावर नवाब मलिक आणि प्रीती शर्मा मेनन यांनी केलेले कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप, अभिनेत्री खा.हेमामालिनी यांना नाममात्र दरात शासनाचा मोठा भूखंड देणे, नागपुरात वाढलेली गुन्हेगारी यांचा उल्लेख करताना खा.किरीट सोमय्या यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कारकिर्द कशी वादग्रस्त राहिली आहे, यावर सहा पाने खर्ची घालण्यात आली आहेत.