शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 18:07 IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा.

सध्या कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून विरोध सुरू आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. बारसू रिफानरीवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची माहिती घ्या, असा सल्ला दिलाय.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची उद्धव ठाकरेंनी माहिती घ्यावी. कॅलिफोर्नियामध्ये रिफायनरीचे १४ प्रकल्प आहेत. तिकडे निसर्ग नाही? मग इकडेच विरोध का? मी काँग्रेसकडून मंत्री असताना असतानाही १० हजार मेगावॅटचा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली. वृत्तपत्रात बातमी आली मातोश्रीत कोळशापासून वीज उत्पादन करणारे ३४ वीज उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले, जैतापुरचा प्रकल्प सुरू करू नका, तो झाला तर आमचे कारखाने बंद पडतील, आम्हाला योग्य दर मिळणार नाही, तोट्यात जाऊ असं होतं. नंतर नेहमीप्रमाणे ५०० कोटी द्यायचं ठरलं आणि ॲडव्हान्स ५ कोटी,” असं नारायण राणे म्हणाले. 

“राऊत काय म्हणतात नारायण राणे त्यांना घेऊन आले होते. अर्धे नारायण राणेंना अर्धे उद्धव ठाकरेंना. त्यांना माहित नाही का मातोश्रीत गेलेल्या पैशाची वाटणी कधी होते का? तिकडे इनकमिंग आहे, आऊटगोईंग नाही. मी तेव्हा काँग्रेसमध्ये मंत्री होतो, मी त्यांना २५० कोटी का देईन. उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत,” असं वक्तव्य त्यांनी केलं.कोकणाच्या विकासात योगदान नाही“महाराष्ट्रात इतके नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आलं जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचं कोकणाच्या विकासात योगदान काही नाही,” असा आरोपही त्यांनी केला.काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत