शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 18:07 IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा.

सध्या कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून विरोध सुरू आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. बारसू रिफानरीवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची माहिती घ्या, असा सल्ला दिलाय.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची उद्धव ठाकरेंनी माहिती घ्यावी. कॅलिफोर्नियामध्ये रिफायनरीचे १४ प्रकल्प आहेत. तिकडे निसर्ग नाही? मग इकडेच विरोध का? मी काँग्रेसकडून मंत्री असताना असतानाही १० हजार मेगावॅटचा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली. वृत्तपत्रात बातमी आली मातोश्रीत कोळशापासून वीज उत्पादन करणारे ३४ वीज उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले, जैतापुरचा प्रकल्प सुरू करू नका, तो झाला तर आमचे कारखाने बंद पडतील, आम्हाला योग्य दर मिळणार नाही, तोट्यात जाऊ असं होतं. नंतर नेहमीप्रमाणे ५०० कोटी द्यायचं ठरलं आणि ॲडव्हान्स ५ कोटी,” असं नारायण राणे म्हणाले. 

“राऊत काय म्हणतात नारायण राणे त्यांना घेऊन आले होते. अर्धे नारायण राणेंना अर्धे उद्धव ठाकरेंना. त्यांना माहित नाही का मातोश्रीत गेलेल्या पैशाची वाटणी कधी होते का? तिकडे इनकमिंग आहे, आऊटगोईंग नाही. मी तेव्हा काँग्रेसमध्ये मंत्री होतो, मी त्यांना २५० कोटी का देईन. उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत,” असं वक्तव्य त्यांनी केलं.कोकणाच्या विकासात योगदान नाही“महाराष्ट्रात इतके नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आलं जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचं कोकणाच्या विकासात योगदान काही नाही,” असा आरोपही त्यांनी केला.काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत