शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधासभेसाठी रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी; म्हणाले, "महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 18:32 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली असून रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांची लवकच घोषणा होण्याची शक्यता असल्याने जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या महत्त्वाच्या नेतेमंडळींशी चर्चा केली. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती दानवेंनी दिली.

"महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीची सगळी तयारी भाजपने केली आहे. निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी भाजपने निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. त्या समितीचा मी प्रमुख आहे. मला विश्वास आहे की भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल आणि या राज्यात पुन्हा आपले सरकार स्थापन करेल," असे रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या व्यवस्थापन समितीत विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विद्यमान खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा