शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

स्वतंत्र विदर्भाबाबत मोदींच्या वक्तव्याने भाजपा नेत्यांची गोची

By admin | Updated: October 8, 2014 04:30 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या भाजपा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उघडे पाडले

मुंबई : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या भाजपा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उघडे पाडले. आपल्यावरील महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे कारस्थान रचल्याचे आरोप झटकण्याकरिता मोदींनी आपण दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, अशी घोषणा केली. यामुळे भाजपातील स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढणे आणि स्वतंत्र विदर्भ या दोन मुद्द्यांवरून शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे मोदी अक्षरश: घायाळ झाले. लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसवर हल्ले करताना दिसलेले मोदी महाराष्ट्रात ‘खुलासा मोड’मध्ये गेलेले दिसले. दोंडाईचा (जि. धुळे) येथील सभेत मोदी म्हणाले की, मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. वेगळा विदर्भ व मुंबईवरून आपल्यावर आरोप केले जातात. परंतु मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून, मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे कुणी तुकडे करू शकत नाही. काही लोक खोटारडा प्रचार करीत आहेत.मोदींनी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेपासून घूमजाव केल्याने विदर्भातील व विशेषकरून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गोची झाली आहे. आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर कायम असून, छोट्या राज्यांबाबत आमची भूमिका कायम आहे. मोदी केवळ मुंबईबाबत बोलत होते, अशी सारवासारव भाजपाने केली. परंतु महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही हे मोदी यांचे विधान मुंबई व विदर्भाला लागू होते. विदर्भातील नेत्यांनी स्वतंत्र राज्याच्या निर्मितीचे आश्वासन जाहीर सभांमधून दिले असल्याने विदर्भाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर विदर्भात काँग्रेसला धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आता मोदींच्या वक्तव्यामुळे विदर्भातील मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.नागपुरात मोदींचे मौन उपराजधानीतील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्या विदर्भाबाबत काय वक्तव्य करतात, याकडे विदर्भवाद्यांसोबतच विरोधकांचेदेखील लक्ष लागले होते. मात्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ब्र शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भवाद्यांची निराशा झाली.