शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 11:36 IST

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाही न करता केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती, दरेकरांचा आरोपयापूर्वी काँग्रेसनंही केला होता नामांतराला विरोध

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राजकीय कलगितुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी संभाजीनगर या नामांतराला विरोध केला होता. आता यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे. कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा," असं दरेकर म्हणाले.  "राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस आणि एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कोणतीही गोष्ट असली की केंद्राकडे बोट दाखवलं जात मग तुम्ही राज्य सरकार का चालवता?," असा सवालही त्यांनी केला. महाकाली लेणीसंदर्भात निर्णय घेताना केंद्राला विचारणा केली होती का? आमच्या अस्मितेशी निगडीत कोणताही विषय केंद्र सरकारकडे अडकणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी राहू परंतु नाचता येईना, अंगण वाकडं, अशी त्यांची गत झाल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.सत्तेला अधिक महत्त्व"बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहिली. काहीही झालं तरी चालेलं. प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर असं नामांतर करू असं म्हटलं होतं. परंतु आता आहे का हिंम्मत? आता त्यांना सत्ता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं लक्ष अधिक काळ विचलित करता येणार नाही," असंही दरेकर म्हणाले. राज्य सरकारनं मंत्रिमंडळात नामांतराचा निर्णय घ्यावा आणि सरकार म्हणून शिफारस करावी. आम्ही केंद्राला मदत करण्यास सांगू. परंतु असं काही करायचं नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती आहे. हे न समजण्याइतकी राज्यातील जनता दुधखुळी नसल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकर