शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 11:36 IST

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाही न करता केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती, दरेकरांचा आरोपयापूर्वी काँग्रेसनंही केला होता नामांतराला विरोध

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राजकीय कलगितुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी संभाजीनगर या नामांतराला विरोध केला होता. आता यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे. कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा," असं दरेकर म्हणाले.  "राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस आणि एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कोणतीही गोष्ट असली की केंद्राकडे बोट दाखवलं जात मग तुम्ही राज्य सरकार का चालवता?," असा सवालही त्यांनी केला. महाकाली लेणीसंदर्भात निर्णय घेताना केंद्राला विचारणा केली होती का? आमच्या अस्मितेशी निगडीत कोणताही विषय केंद्र सरकारकडे अडकणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी राहू परंतु नाचता येईना, अंगण वाकडं, अशी त्यांची गत झाल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.सत्तेला अधिक महत्त्व"बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहिली. काहीही झालं तरी चालेलं. प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर असं नामांतर करू असं म्हटलं होतं. परंतु आता आहे का हिंम्मत? आता त्यांना सत्ता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं लक्ष अधिक काळ विचलित करता येणार नाही," असंही दरेकर म्हणाले. राज्य सरकारनं मंत्रिमंडळात नामांतराचा निर्णय घ्यावा आणि सरकार म्हणून शिफारस करावी. आम्ही केंद्राला मदत करण्यास सांगू. परंतु असं काही करायचं नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती आहे. हे न समजण्याइतकी राज्यातील जनता दुधखुळी नसल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकर