शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:30 IST

Param Bir Singh Letter: महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देराम कदम यांची ठाकरे सरकारवर टीकाराज्यातील जनतेला मुर्ख समजू नये - राम कदमवाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या - राम कदम

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशातच भाजप नेते राम कदम यांनीही टीका करत वाझे गँगला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे म्हटले आहे. (bjp leader ram kadam slams on thackeray govt over param bir singh letter)

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. वाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे सरकारने मुर्ख समजू नये, अशी टीका राम कदम यांनी केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

पवारांना किती सारवासारव करायला भाग पाडणार

खरंच... स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?, थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा. अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलेला दिसतोय. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है, असे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. 

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगRam Kadamराम कदमBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण