शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:22 IST

Param Bir Singh Letter: भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर टीकाप्रवीण दरेकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटसत्तेत राहण्याची नैतिकता सरकारला नाही - प्रवीण दरेकर

मुंबई : सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण राज्यातील प्रकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले जात आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. (bjp leader pravin darekar slams thackeray govt over param bir singh letter and sachin vaze case)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचवावा. केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून नाही. तर, राज्यात सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

सत्तेत राहण्याची नैतिकता सरकारला नाही

गृहमंत्रीच १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट देत असतील, तर सत्तेत राहण्याची नैतिकताच सरकारला नाही. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवार उडालेला आहे. कुणीही सुरक्षित नाही, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राष्ट्रपती या सर्व गोष्टींचा आढावा घेत असतात व घटनेने दिलेल्या सर्व गोष्टी ते करत असतात, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

तीन पक्षाचे सरकार टिकवायचे हा एकमेव अजेंडा

महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले आहे. राज्यात शेतकऱ्याचं काय सुरू आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, पोलीस विभागात काय सुरू आहे. कोरोना रूग्ण आजही वाढत आहेत. केवळ आमच्या तीन पक्षांचा समन्वय राहिला पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. या भोवतीच हे सरकार फिरताना दिसते आहे. कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाहीत, केवळ तीन पक्षाचे सरकार कसे टिकवायचे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpravin darekarप्रवीण दरेकरParam Bir Singhपरम बीर सिंगbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPresident Ruleराष्ट्रपती राजवटsachin Vazeसचिन वाझेBJPभाजपा