शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:22 IST

Param Bir Singh Letter: भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर टीकाप्रवीण दरेकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटसत्तेत राहण्याची नैतिकता सरकारला नाही - प्रवीण दरेकर

मुंबई : सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण राज्यातील प्रकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले जात आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. (bjp leader pravin darekar slams thackeray govt over param bir singh letter and sachin vaze case)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचवावा. केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून नाही. तर, राज्यात सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

सत्तेत राहण्याची नैतिकता सरकारला नाही

गृहमंत्रीच १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट देत असतील, तर सत्तेत राहण्याची नैतिकताच सरकारला नाही. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवार उडालेला आहे. कुणीही सुरक्षित नाही, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राष्ट्रपती या सर्व गोष्टींचा आढावा घेत असतात व घटनेने दिलेल्या सर्व गोष्टी ते करत असतात, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

तीन पक्षाचे सरकार टिकवायचे हा एकमेव अजेंडा

महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले आहे. राज्यात शेतकऱ्याचं काय सुरू आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, पोलीस विभागात काय सुरू आहे. कोरोना रूग्ण आजही वाढत आहेत. केवळ आमच्या तीन पक्षांचा समन्वय राहिला पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. या भोवतीच हे सरकार फिरताना दिसते आहे. कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाहीत, केवळ तीन पक्षाचे सरकार कसे टिकवायचे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpravin darekarप्रवीण दरेकरParam Bir Singhपरम बीर सिंगbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPresident Ruleराष्ट्रपती राजवटsachin Vazeसचिन वाझेBJPभाजपा