शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:41 IST

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पवार यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, प्रत्यक्ष पाहणी करावी असेही पवार म्हणाले.

विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेकांचा संसार उघड्यावर आला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा केला. शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी अजून पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही. ते तातडीने करून अहवाल शासनाकडे सादर करा, असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

अजित पवारांच्या या दौऱ्यावर मात्र भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. अजित पवारांना फार लवकर जाग आली. पूरग्रस्त भागाची पाहणी व मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ पोहोचले होते. वास्तविक पाहता विरोधी पक्ष नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरकारला सूचना द्यायच्या असतात, परंतु वराती मागून घोडे नाचवण्याचा विरोधी पक्ष नेत्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. 

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता आणि मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असताना तात्काळ नुकसानग्रस्त भागात पोहचत होतो. परंतु यांचा आपला मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडल्यास महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. म्हणून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते २० दिवस उशीरा पोहचले, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज्यात दहा लाख हेक्टरवरील जमीन पूरामुळे बाधित झाली असून शेती पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पूरामुळे शेतीसह नुकसान झालेल्या घरांचेही पंचनामे करा आणि नागरिकांना तातडीची मदत करा. निधी केंद्र सरकारकडून आणावी की, राज्य सरकारने द्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र वेळेत मदत झाली पाहीजे असंही पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन घेण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpravin darekarप्रवीण दरेकर