शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:41 IST

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पवार यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, प्रत्यक्ष पाहणी करावी असेही पवार म्हणाले.

विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेकांचा संसार उघड्यावर आला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा केला. शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी अजून पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही. ते तातडीने करून अहवाल शासनाकडे सादर करा, असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

अजित पवारांच्या या दौऱ्यावर मात्र भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. अजित पवारांना फार लवकर जाग आली. पूरग्रस्त भागाची पाहणी व मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ पोहोचले होते. वास्तविक पाहता विरोधी पक्ष नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरकारला सूचना द्यायच्या असतात, परंतु वराती मागून घोडे नाचवण्याचा विरोधी पक्ष नेत्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. 

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता आणि मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असताना तात्काळ नुकसानग्रस्त भागात पोहचत होतो. परंतु यांचा आपला मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडल्यास महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. म्हणून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते २० दिवस उशीरा पोहचले, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज्यात दहा लाख हेक्टरवरील जमीन पूरामुळे बाधित झाली असून शेती पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पूरामुळे शेतीसह नुकसान झालेल्या घरांचेही पंचनामे करा आणि नागरिकांना तातडीची मदत करा. निधी केंद्र सरकारकडून आणावी की, राज्य सरकारने द्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र वेळेत मदत झाली पाहीजे असंही पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन घेण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpravin darekarप्रवीण दरेकर