शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:57 IST

Param Bir Singh Letter: नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाराष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार - राणेराज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात - राणे

सिंधुदुर्ग :सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगणी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहे. यानंतर विद्यमान भाजप खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी ठाकरे सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असा दावा केला आहे. (bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon)

नारायण राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप यांसारख्या मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य होणार असून, आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार आहे, असेही राणे म्हणाले.

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते, असा दावा करत वाझेंकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील, तर त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला हवी. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये, असे नारायण राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंना पाठीशी घातले

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातले, अशी टीका नारायण राणे यांनी केली. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये, म्हणून मुख्यमंत्रीनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप होऊनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख यांना वाचवण्यासाठी त्यांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. कोणी निंदा, कोणी वंदा भ्रष्टाचार करणे हाच आमचा धंदा, असाच एकंदर या सरकारचा कारभार या सगळ्यातून दिसतो, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPresident Ruleराष्ट्रपती राजवटParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेSharad Pawarशरद पवारMansukh Hirenमनसुख हिरणBJPभाजपा