शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:57 IST

Param Bir Singh Letter: नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाराष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार - राणेराज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात - राणे

सिंधुदुर्ग :सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगणी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहे. यानंतर विद्यमान भाजप खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी ठाकरे सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असा दावा केला आहे. (bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon)

नारायण राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप यांसारख्या मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य होणार असून, आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार आहे, असेही राणे म्हणाले.

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते, असा दावा करत वाझेंकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील, तर त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला हवी. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये, असे नारायण राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंना पाठीशी घातले

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातले, अशी टीका नारायण राणे यांनी केली. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये, म्हणून मुख्यमंत्रीनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप होऊनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख यांना वाचवण्यासाठी त्यांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. कोणी निंदा, कोणी वंदा भ्रष्टाचार करणे हाच आमचा धंदा, असाच एकंदर या सरकारचा कारभार या सगळ्यातून दिसतो, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPresident Ruleराष्ट्रपती राजवटParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेSharad Pawarशरद पवारMansukh Hirenमनसुख हिरणBJPभाजपा